महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 21, 2020, 7:59 PM IST

ETV Bharat / business

इंधनाचे दर कमी करण्याची वाहतूक संघटनेची मागणी

एआयएमटीसी ही ९५ लाख ट्रक आणि इतर वाहतूक संघटनांचे प्रतिनिधीत्व करते. जागतिक बाजारात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून कोणताही दिलासा देण्यात आला नसल्याचे एआयएमटीसीचे अध्यक्ष कुलरतन सिंह अटवाल यांनी म्हटले आहे.

ट्रक वाहतूक
ट्रक वाहतूक

नवी दिल्ली - खनिज तेलाचे दर कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) सरकारकडे केली आहे. टाळेबंदीत ट्रकचालक समस्येला सामोरे जात असताना टोल वसुली थांबवावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

एआयएमटीसी ही ९५ लाख ट्रक आणि इतर वाहतूक संघटनांचे प्रतिनिधीत्व करते. जागतिक बाजारात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करून कोणताही दिलासा देण्यात आला नसल्याचे एआयएमटीसीचे अध्यक्ष कुलरतन सिंह अटवाल यांनी म्हटले आहे. सरकारने मे २०१४पासून खनिज तेलाचे दर कमी होताना त्याचा फायदा लोकांना मिळवून दिला आहे. उलट सरकारने उत्पादन शुल्क वाढवून सरकारी तेल कंपन्यांनाचा नफा वाढविला आहे.

हेही वाचा-कोरोनाविरोधात लढा : सिप्ला केंद्र सरकारला करणार २५ कोटींची मदत

उत्पादन शुल्क हे पेट्रोलवर प्रति लीटर ९.२० रुपये तर डिझेलवर ३.४६ रुपये प्रति लीटर आहे. दुसरीकडे कर आणि व्हॅटचे प्रमाण जास्त आहे. टोल नाक्यावरील टोल वसुली किमान सहा महिने थांबवावी, अशी मागणी कुलरतन सिंह अटवाल यांनी केली. चालकाला कोरोनाचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली. माल भरताना व उतरविताना २०० किमीवर प्रत्येक वाहनाचे सॅनिटायझेशन केले जात असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा-व्हॉट्सअ‌ॅपची झुमला टक्कर; 'हे' आहे फीचर्स

ABOUT THE AUTHOR

...view details