महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाटा-मिस्त्री प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय २ डिसेंबरला करणार सुनावणी - advocate CA Sundaram in Mistry case

सायरस मिस्त्री यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सी. ए. सुंदरम यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. प्रकरण हे अंतिम सुनावणीसाठी डिसेंबरला ठेवूनही ते सातत्याने अर्ज दाखल करत होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी वकील सुंदरम यांना कशामुळे अर्ज दाखल करत आहात, असा प्रश्न केला.

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

By

Published : Nov 19, 2020, 1:28 PM IST

नवी दिल्ली- टाटा-मिस्त्री प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय २ डिसेंबरला अंतिम सुनावणी करणार आहे. एनसीएलएटीने सायरस मिस्त्री यांचे टाटा सन्सचे चेअरमनद पूर्वीप्रमाणे ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला टाटा ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सायरस मिस्त्री यांच्यातर्फे वरिष्ठ वकील सी. ए. सुंदरम यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. प्रकरण हे अंतिम सुनावणीसाठी डिसेंबरला ठेवूनही ते सातत्याने अर्ज दाखल करत होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी वकील सुंदरम यांना कशामुळे अर्ज दाखल करत आहात, असा प्रश्न केला. त्यावर सुंदरम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस काही आणून द्यायचे असल्याचे सांगितले. ते विषय अंतिम सुनावणीत मांडता येणार नाहीत का? तुम्ही उपस्थित केलेले सर्व प्रश्न अंतिम सुनावणीत उपस्थित करणे शक्य असल्याचे सरन्यायाधीशांनी सुंदरम यांना सांगितले.

एनसीएलएटीने काय दिला होता निकाल?

एनसीएलएटीने सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पुन्हा नियुक्ती करण्याचे डिसेंबर २०१९ मध्ये आदेश दिले आहेत. तर एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी चेअरमनपदावरील नियुक्तीही एनसीएलएटीने बेकायदेशीर असल्याचे निकालात म्हटले होते. मिस्त्री यांना रतन टाटा यांच्या जागी टाटा सन्सच्या चेअरमनपदी डिसेंबर २०१२ ला जबाबदारी स्वीकारली होती. या कालावधीत त्यांनी टाटा ग्रुपमधील टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details