महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बोगस ई-वे बिलाला आळा घालण्यासाठी महसूल विभाग स्थापणार समिती

५० हजार रुपयाहून अधिक किमतीच्या मालाची वाहतूक केल्यास जीएसटी निरीक्षकाला ई-वे बिल सादर करता येतात.

By

Published : Feb 17, 2019, 9:36 PM IST

4

नवी दिल्ली- महसूल विभागाने बोगस ई-वे बिलाला आळा घालण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये केंद्र सरकारसह राज्याच्या प्राप्तीकर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.


खोटी बिले दाखून अनेक बोगस ई-वे बिल तयार केल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीआयसी) एप्रिलमध्ये निदर्शनास आणले आहेत. यातून ५ हजार कोटींचा कर बुडल्याचे केंद्र सरकारच्या प्राप्तिकर अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. समिती बोगस ई-वे बिल सादर करण्याच्या पद्धतीचे विश्लेषण करणार आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी उपाय सुचविणार आहे. महसूल विभाग हा ई-वे बिल यंत्रणा ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मदतीने मालवाहतूक ट्रॅक करणार आहे.

विविध माल वाहतुकीच्या खेपा करून एकावेळीच नोंदणी केल्याचे तपास अधिकाऱ्यांना निदर्शनास आले आहे. एप्रिल-डिसेंबर २०१८ दरम्यान केंद्रीय प्राप्तीकर अधिकाऱ्यांना ३ हजार ६२६ करचुकवेगिरीच्या घटना आढळून आले आहेत. यातून १५ हजार २७८.१८ कोटींची करचुकवेगिरी केल्याचा अंदाज आहे. ५० हजार रुपयाहून अधिक मालाची वाहतूक केल्यास जीएसटी निरीक्षकाला ई-वे बिल सादर करता येतात.


ABOUT THE AUTHOR

...view details