नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारला २८ हजार कोटींचा लाभांश देण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे.
आरबीआयच्या भांडवलाची पुनर्रचना आणि मर्यादित लेखापरीक्षण यांचा विचार करून संचालक मंडळाने लांभाश सरकारला देण्याचा निर्णय घेतला. हा लाभांश ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचा आहे. चालू आर्थिक वर्षात आरबीआय दुसऱ्यांदा लाभांश केंद्र सरकारकडे वर्ग करणार आहे. यापूर्वी १० हजार कोटींचा लाभांश आरबीआयने केंद्र सरकारला दिला आहे.