नवी दिल्ली– देशातील महागाई खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आहे. देशातील महागाई जवळपास शून्य असल्याचा दावा पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी केला. ते 'इंडिया ग्लोबल वीक 2020' च्या व्हर्च्युअल फोरममध्ये बोलत होते.
देशात विदेशी चलनाचा साठा हा जवळपास पन्नास हजार कोटी डॉलर आहे. भारतावरील 1991 च्या आर्थिक संकटावर बोलताना संन्याल म्हणाले, की 1919 मध्ये अर्थव्यवस्थेचे नियंत्रण सुटले होते. सध्या, तशी स्थिती नाही. देशात महागाई नियंत्रणात आहे.
अर्थव्यवस्थेचा काही भाग स्थिर आहे. केंद्र सरकार आणि राज्यांना त्यांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात काम करण्यासारखे आहे. आम्ही सूचना घेण्यासाठी खुले आहोत. कोरोनाच्या संकटामुळे फटका बसलेल्या लघू उद्योगांना दिलासा देण्यासाठी सरकारने योजना जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.