महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाळेबंदीत भारतीयांना कोरोनाची नव्हे तर 'ही' भेडसावते चिंता - Indian Economy

प्राथमिक अंदाजानुसार देशातील लाखो लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. तर शहरातील बेरोजगारीचे प्रमाण हे ३०.९ टक्क्यापर्यंत वाढण्याची भीती आहे.

Employment
रोजगार

By

Published : Apr 15, 2020, 1:31 PM IST

नवी दिल्ली- कोरोना महामारीचे संकट ओढवले असताना ५ पैकी ४ भारतीयांना नोकरी गमाविण्याची भीती आहे. ही माहिती सर्व्हेमधून समोर आली आहे. कोरोनाच्या धसक्याने देशातील अनेक उद्योग आणि व्यवसाय ठप्प झाले आहेत.

इंटरनेटवर आधारित असलेल्या बाजारपेठ संशोधन आणि डाटा अॅनालिटिक्सची सेवा देणाऱ्या युगव्ह संस्थेने नागरिकांचे सर्वेक्षण केले. यामध्ये कोरोनामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या चिंतेवर प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणानुसार २० टक्के नागरिकांना नोकऱ्या गमाविण्याची चिंता वाटत आहे. तर १६ टक्के लोकांना वेतन कपातीची भीती आहे. तर ८ टक्के लोकांना चालू वर्षात बोनस आणि वेतनवाढ न होण्याची भीती आहे.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात इंग्लंडला भारताने 'अशी' केली मदत

प्राथमिक अंदाजानुसार देशातील लाखो लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. तर शहरातील बेरोजगारीचे प्रमाण हे ३०.९ टक्क्यापर्यंत वाढण्याची भीती आहे. यापूर्वीच बेरोजगारीचे प्रमाण हे २३.४ टक्क्यापर्यंत वाढले होते.

हेही वाचा-लॉकडाऊन २ - जाणून घ्या कोणते व्यवसाय राहणार सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details