महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 28, 2019, 6:31 PM IST

Updated : Aug 28, 2019, 10:56 PM IST

ETV Bharat / business

जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार देणार ५० हजार नोकऱ्या

सरकारी नोकऱ्या जम्मू आणि काश्मीर प्रशासनामध्ये असणार आहेत. यामध्ये तरुणांना उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले. येत्या दोन-तीन महिन्यात पदे भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल सत्यपाल मलिक

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर धुमसणाऱ्या नंदनवनाला सरकारने मोठा दिलासा दिला आहे. तिथे सरकार ५० हजार सरकारी नोकऱ्या देणार आहे. याबाबतची घोषणा जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

सरकारी नोकऱ्या जम्मू आणि काश्मीर प्रशासनामध्ये असणार आहेत. भरती प्रक्रियेमध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले. येत्या दोन-तीन महिन्यात पदे भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Aug 28, 2019, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details