महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 6, 2020, 4:25 PM IST

ETV Bharat / business

भारतीय स्टार्टअप क्षेत्राची टाळेबंदीतही चमकदार कामगिरी

असे असले तरी भारतीय स्टार्ट अपची मानवाच्या सर्वात कठीण काळात कोरोनाच्या संकटात घोडदौड सुरू आहे. अमेरिका, चीन त्यानंतर भारताचा जगात स्टार्ट अपच्या क्षेत्रात तिसरा क्रमांक आहे.

युनिकॉर्न इंडियाचे संस्थापक अनिल जोशी
युनिकॉर्न इंडियाचे संस्थापक अनिल जोशी

नवी दिल्ली- देशभरात लागू करण्यात आलेली टाळेबंदी भारतीय अंत्रेप्रेनेन्युर आणि गुंतवणूकदार समुदायाच्या उत्साहावर विरजण टाकण्यात अपयशी ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला संपूर्ण देशात टाळेबंदी लागू केली. त्यामागे कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, हा हेतू होता. देशामध्ये सुमारे 6 हजार 600‌ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात गेल्या सहा महिन्यात कोरोनामुळे सुमारे चार लाख जणांचा जगभरात मृत्यू झाला आहे.

जगभरातील विविध देशांसह भारत सरकारने उद्योग आणि व्यवसाय बंद केले. देशातील रेल्वे ,विमान आणि रस्ते वाहतूक बंद केली. त्यानंतर देशातले आर्थिक चलन वलन प्रक्रिया पूर्ण बंद पडली. त्याचा परिणाम म्हणून जागतिक अर्थव्यवस्थेचे सुमारे नऊ लाख कोटी डॉलरचे चालू वर्षात नुकसान होणार आहे.

असे असले तरी भारतीय स्टार्टअपची मानवाच्या सर्वात कठीण काळात कोरोनाच्या संकटात घोडदौड सुरू आहे. अमेरिका, चीन त्यानंतर भारताचा जगात स्टार्ट अपच्या क्षेत्रात तिसरा क्रमांक आहे.

मुंबईस्थित युनिकॉर्न इंडिया वेंचरचे संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार अनिल जोशी म्हणाले, की स्टार्टअपच्या अर्जांमध्ये निश्चितच संख्या वाढली आहे.

दररोज साधारणतः आठ ते दहा अर्ज येत आहेत. प्रत्येक स्टार्टअप एक ते 15 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवू इच्छित आहेत, असे जोशी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. कोरोनाच्या संकटात आलेल्या चार ते पाच अर्जानुसार गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी सांगितले.

सोशल इम्पॅक्ट इन्वेस्टर अविष्कार ग्रुपने दोन स्टार्ट अपला आर्थिक मदत केली आहे. मार्चमध्ये पाच दशलक्ष डॉलरची अविष्कार ग्रुपने गुंतवणूक केली आहे. तर एका एग्रीटेक स्टार्ट अपमध्ये 35 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे स्टार्टअपच्या अर्जांचे प्रमाण कमी झाले नसल्याचे सुषमा कौशिक यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.

कोरोनामुळे घोषित केलेली टाळेबंदी आणि प्रत्यक्ष न होणाऱ्या बैठकींचा स्टार्टअपचे मूल्यांकन करण्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे कौशिक यांनीही ई टीव्ही भारतला बोलताना सांगितले. गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असून स्टार्ट‌अप मोठे काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

(लेखक-कृष्णानंद त्रिपाठी)

ABOUT THE AUTHOR

...view details