महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 20, 2020, 10:45 AM IST

ETV Bharat / business

सर्व किरकोळ विक्रेत्यांना घरपोहोच मालाची परवानगी द्या - रिटेल असोसिएशन

टाळेबंदीत नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत किरकोळ मालाचे विक्रेते आणि देशातील पुरवठा साखळीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आला नसल्याचे बोलले जात आहे.

किराणा दुकान
किराणा दुकान

नवी दिल्ली- सर्व प्रकारच्या किरकोळ मालाच्या विक्रेत्यांना घरपोहोच उत्पादने विक्री करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रिटेल्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आरएआय) केली आहे. सध्या, केवळ ई-कॉमर्स कंपन्यांनाच घरपोहोच उत्पादने पोहोचविण्याची परवानगी आहे.

केंद्र सरकारने टाळेबंदीदरम्यान ई-कॉमर्स कंपन्यांना ३ मेपर्यंत जीवनावश्यक वस्तुंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. या कंपन्यांना जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकींसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आरएआयनेही अशी परवानगी मागितली आहे. सर्व नियमांचे पालन करून उत्पादने घरपोहोच देवू, असे रिटेल असोसिएशनने म्हटले आहे.

हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ४०० अंशांनी वधारला: 'या' कंपन्यांचे वधारले शेअर

टाळेबंदीत नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत किरकोळ मालाचे विक्रेते आणि देशातील पुरवठा साखळीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आला नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा-टाळेबंदीत अक्षय तृतीया : सोने खरेदीकरिता 'या' ज्वेलर्सने दिला ऑनलाईन पर्याय

ABOUT THE AUTHOR

...view details