महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कांदा खाणे केले बंद, कारण... - पियूष गोयल

दरम्यान, देशभरात कांद्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने गेल्या रविवारी कांदे निर्यातीवर बंदी लागू केली आहे. त्याचा फटका बांगलादेशलाही बसत आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना

By

Published : Oct 4, 2019, 6:28 PM IST

नवी दिल्ली - कांद्याचे भाव वाढल्याने भारतीयांनाच नव्हेतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही परिणाम झाला आहे. आपल्या आचारीला अन्नात कांद्याचा वापर करू नका, असे त्यांनी सांगितले आहे. भारताने कांदा निर्यात बंद करण्यापूर्वी त्याची माहिती द्यायला हवी होती, असेही त्यांनी सांगितले. त्या भारत-बांगलादेश उद्योग मंचात बोलत होत्या.

भारत-बांगलादेश उद्योग मंचाने परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे आयोजन सीआयआय आणि अ‌ॅसोचॅमच्यावतीने करण्यात आले आहे. या परिषदेत बोलताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना म्हणाल्या, भारताने अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने बांगलादेशमधील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मला माहित नाही, तुम्ही कांद्याची निर्यात का थांबविली? मात्र, निर्यात बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही माहिती दिल्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा-पीएमसी घोटाळा: ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची नोंद; मुंबईत सहा ठिकाणी छापे

दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये व्यापार करण्यासाठी प्रचंड क्षमता असल्याचे त्यांनी म्हटले. दक्षिण आशियात बांगलादेशमध्ये सर्वात अधिक गुंतवणुकीसाठी उदारीकरणाचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये विदेशी गुंतवणूक संरक्षण कायदा व मशिनरीच्या आयात शुल्कात सवलत आदी बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामधील मोठे उद्योजक बांगलादेशमध्ये उद्योग सुरू करू शकतात. त्यामुळे त्यांना उत्तर-पूर्वेकडील भारताच्या राज्यासंह दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये निर्यात करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-सॅमसंगच्या चीनमधील स्मार्टफोन कारखान्याला टाळे; 'हे' आहे कारण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल म्हणाले, भारतीय उद्योगाने शेजारील राष्ट्रामधील उद्योगाच्या संधी घेतल्या पाहिजेत. रेल्वे उद्योगामधील भारताचा अनुभव बांगलादेशबरोबर सामायिक करण्यासाठी सरकार तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन देशामध्ये सुरू असलेल्या तीन रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यावर सरकार विचार करत असल्याची त्यांनी माहिती दिली.

दरम्यान, देशभरात कांद्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने गेल्या रविवारी कांदे निर्यातीवर बंदी लागू केली आहे. तसेच किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना मर्यादित कांदे साठा करण्याचे आदेश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details