महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 8, 2020, 2:19 PM IST

ETV Bharat / business

कोरोना विषाणू परिणाम : सरकारने १२ बंदरावर सतर्कतेचे दिले आदेश

जहाजबांधणी मंत्रालयाने एन-९५ मास्क खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच थर्मल स्कॅनरने प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत

File photo - Corona Virus
संग्रहित - कोरोना विषाणू

नवी दिल्ली - कोरोना विषाणूजन्य रोगाचे जगभरात प्रमाण वाढत असताना केंद्र सरकारने देशात खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्व मोठ्या १२ बंदरावर तातडीने निर्जुंतुकीकरण आणि प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जहाजबांधणी मंत्रालयाने एन-९५ मास्क खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच थर्मल स्कॅनरने प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. चीनमधील वुआन शहरामधून कोरोनो विषाणुजन्य रोगाची जगभरातील २५ देशात लागण झाली आहे. तर केरळमध्येही दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातमी वाचा-चीनमध्ये कोरोनाचे ७१९ बळी; आरोग्य आणिबाणी हाताळताना चीनची दमछाक

चीनमध्ये कोरोनाचे ७१९ बळी-
चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा ७१९ वर पोहोचला आहे. तर, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ३४ हजारवर पोहोचला आहे. दोन दशकांपूर्वी सार्स आजारामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा कोरोना विषाणूने पार केला आहे.

संबंधित बातमी वाचा-कोरोना विषाणूचा परिणाम; शिंक चीनला अन् सर्दी जगाला...

ABOUT THE AUTHOR

...view details