महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 9, 2019, 5:32 PM IST

ETV Bharat / business

वाहन उद्योगांना मंदीचा फटका; अशोक लिलँड महाराष्ट्रासह ५ राज्यांतील उत्पादन प्रकल्प ठेवणार बंद

अशोक लिलँडने सप्टेंबरमध्ये काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्यात येणार असल्याचे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. चेन्नईची मूळ कंपनी असलेल्या अशोक लिलँडने इन्नोरमधील उत्पादन प्रकल्प १६ दिवस बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.

संग्रहित - अशोक लिलँड

चेन्नई - वाहन उद्योगातील मंदीचा वाहन कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. बाजारामधून मागणी कमी झाल्याने हिंदूजा ग्रुपची मालकी असलेली अशोक लिलँडने काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील बांद्रा येथील उत्पादन प्रकल्प १० दिवस बंद राहणार आहे.

अशोक लिलँडने सप्टेंबरमध्ये काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्यात येणार असल्याचे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. चेन्नईची मूळ कंपनी असलेल्या अशोक लिलँडने इन्नोरमधील उत्पादन प्रकल्प १६ दिवस बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. तर तामिळनाडूमधील होसूरमधी प्रकल्प ५ दिवसासाठी बंद राहणार आहे. राजस्थानमधील अलवार व महाराष्ट्रातील बांद्रा येथील उत्पादन प्रकल्प १० दिवस बंद राहणार आहे. तर उत्तराखंडमधील पटनानगरमधील उत्पादन प्रकल्प १८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

हेही वाचा-धक्कादायक! 32,000 कोटींच्या विविध प्रकरणात 18 सरकारी बँकांची फसवणूक


गेल्या महिन्यात चेन्नई येथील टीव्हीस ग्रुपची मालकी असलेल्या सुंदरम क्लेटॉन, मारुती सुझुकी व दुचाकी कंपनी मोटोकॉर्पने काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मागणी कमी झाल्याने हा कंपन्यांनी निर्णय घेतला.

हेही वाचा-वाहन उद्योगावर 'मंदीचे ग्रहण'; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग १० व्या महिन्यात घसरण

टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रांनीदेखील बाजारामधील मागणी कमी झाल्याचे पाहून काही दिवस उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. बाजार बंद होण्यापूर्वी अशोक लिलँडचे शेअर हे १.३३ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर ६३.०५ रुपये झाला होता.

हेही वाचा-सणाच्या मुहुर्तावर एसबीआयकडून दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात

ABOUT THE AUTHOR

...view details