महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 28, 2020, 4:16 PM IST

ETV Bharat / briefs

नंदुरबार जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने युवकाचा मृत्यू; 24 तासात 247 मि.मी. इतका पाऊस

पाऊस सुरू असताना कमलेश गावित शेतातील वडाच्या झाडाखाली उभा होता. यावेळी वीज अंगावर पडल्याने कमलेशचा मृत्यू झाला आहे. याबाबत बालाजी दावा गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली.

Youth died lightening strike
Youth died lightening strike

नंदुरबार - जिल्ह्यात वरूणराजाने दमदार हजेरी लावली. या पहिल्या पावसामुळे शेतीशिवारांसह काही वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. नवापूर तालुक्यातील ईटवाई शिवारात शेतातील झाडाखाली उभ्या असलेल्या एकाच्या अंगावर वीज पडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पहिल्या पावसाचा पहिला बळी गेला आहे. तर जिल्ह्यात 24 तासात 247 मि.मी. इतका पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात 41.16 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ईटवाई येथील कमलेश बालाजी गावित (वय 18) हा युवक शेतात गेला होता. यावेळी मुसळधार पाऊस होत असल्याने तो शेतातील वडाच्या झाडाखाली उभा होता. यावेळी वीज अंगावर पडल्याने कमलेशचा मृत्यू झाला आहे. याबाबत बालाजी दावा गावित यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल चौरे करित आहेत.

दरम्यान, दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वरूणराजाचे आगमन होण्याचा अंदाज असतो. परंतु यंदा वरूणराजाने जून महिन्यात तब्बल 20 दिवसानंतर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती पिकांना फायदा होणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे.

26 (शुक्रवार) तारखेला 24 तासात 247 मि.मी. पाऊस बरसला. तर आतापर्यंत जिल्ह्यात 41.16 टक्के इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यात नंदुरबार तालुक्यात 97 मि.मी, नवापूर तालुक्यातील 7 मि.मी, तळोदा तालुक्यात 31 मि.मी, शहादा तालुक्यात 96 मि.मी, अक्कलकुव्यात 1 मि.मी, अक्राणीत 15 मि.मी, असा शुक्रवारी पाऊस झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details