महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 3, 2021, 8:44 AM IST

ETV Bharat / briefs

हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सध्या शेतकऱ्यांनी हळद वाळवण्यासाठी शेतात, छतावर टाकलेली आहे. तर विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसात वसमत तालुक्यातील पुयना येथील शेतकरी साहेबराव ब्रह्माजी जामगे (५०) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.

Hingoli heavy rain
हिंगोली जोरदार पाऊस

हिंगोली -जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली असता, वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाची गती पाहून जणू काय पावसाळाच सुरू झाला आहे याचाच अनुभव येत होता.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढलेली असताना, प्रत्येक जण हैराण झाला आहे. अशातच पावसाने हजेरी लावली, यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांनी हळद वाळवण्यासाठी शेतात, छतावर टाकलेली आहे. तर विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसात वसमत तालुक्यातील पुयना येथील शेतकरी साहेबराव ब्रह्माजी जामगे (५०) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.

सद्या शेतकरी हळदीच्या कामात मग्न झालेले आहेत. रात्रंदिवस एक करीत शेतकरी हळद वाळवून घेत आहेत, त्यामुळे जिकडे तिकडे शेती व घरासमोरील मोकळ्या अंगणात हळद वळवण्यासाठी टाकलेली आहे. मात्र, पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडवली.

निसर्गही कोपला शेतकऱ्यावर -

अस्मानी आणि सुलतानी संकट हे शेतकऱ्यांचा काही केल्या पिछा सोडत नाही आहे. अगोदरच कोरोनामुळे प्रत्येकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. असे असतानाच हजेरी लावलेल्या पावसाने तारांबळ उडाली आहे. सध्या उन्हाळी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत त्या पिकासाठी हा अवकाळी पाऊस लाभदायक झाला असून, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यप्राणी तसेच गुरांना काही प्रमाणात का होईना, पाणी उपलब्ध झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details