महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

अहो तुम्हीच सांगा पैसे आणायचे तरी कुठून....! प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी मुंडन आंदोलन - पीक कर्ज आंदोलन वर्धा

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सीसीआय आणि नाफेडची खरेदी कासवगतीने सुरू आहे. हजारोच्या संख्यने टोकन देवून अजूनही शिल्लक असल्याने खरेदीला नंबर कधी लागेल याच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहे. दुसरीकडे बँकेचे धोरण अडचण वाढवणारे आहे. बियाणे सुद्धा उधार भेटत नाही. बँकेत अर्ज केले पण अजूनही कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही. याचाच पाठपुरावा करण्यासाठी शिवराय विद्यार्थी संघटना आणि भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

wardha news
wardha news

By

Published : Jun 16, 2020, 10:00 PM IST

वर्धा - प्रलंबित पीक कर्जे निकाली काढण्यासाठी मंगळवारी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. सध्या कापूस घरात पडून आहे. नाफेडचा चणा खरेदी बंद आणि बँका कर्ज देत नाही. खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरी बियाणे खरेदी करायला पैसा नाही, असे अनके प्रश्न असताना पैसे आणायचे तरी कोठून, असा सवाल यावेळी बँकेला करण्यात आला. बँकेकडून पीक कर्जासाठी होत असलेल्या विलंबाला कंटाळून हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील शेतकरी गोपाल मेघरे यांनी याबाबत निषेध नोंदवला आहे.

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे सीसीआय आणि नाफेडची खरेदी कासवगतीने सुरू आहे. हजारोच्या संख्यने टोकन देवून अजूनही शिल्लक असल्याने खरेदीला नंबर कधी लागेल याच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहे. दुसरीकडे बँकेचे धोरण अडचण वाढवणारे आहे. बियाणे सुद्धा उधार भेटत नाही. बँकेत अर्ज केले पण अजूनही कर्ज प्रकरण मंजूर झाले नाही. याचाच पाठपुरावा करण्यासाठी शिवराय विद्यार्थी संघटना आणि भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यासह शेतकरी गोपाल मेघरे आणि शिवराय विद्यार्थी संघटनेचे नितील सेलकर यांनी मुंडन करून प्रलंबित बँक कारभाराचा निषेध केला.

बँकेत मॅनेजर आहे पण फिल्ड ऑफिसर नाही -

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या अडचणी तसेच बँक फिल्ड ऑफिसर मागील तीन आठवड्यापासून नसल्यामुळे कर्ज प्रकरण प्रलंबित आहे. यासाठी पाठपुरा करण्यात आला असून लवकरच दुसरे अधिकारी यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी दिली. यासह यावर पुढील 7 दिवसात अधिकारी येताच रोज 50 प्रकरणे या प्रमाणे बँकलॉक भरून काढला जाईल. तसेच त्याचा पाठवपूरावा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडववले जातील, अशी माहिती नायब तहसीलदार शमशेर पठाण यांनी ईटीव्ही भारताला दिली.

दरम्यान, भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे वर्धा जिल्हाध्यक्ष योगेश घोगरे, शिवराय विद्यार्थी संघटनेचे संस्थपक अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर, यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. पिक कर्जाला शेतकऱ्यांना अजून त्रास दिला तर संपूर्ण जिल्हात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details