महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आज...आत्ता...( बुधवार ३ जुलै २०१९ दुपारी २ पर्यंत महत्वाच्या बातम्या )

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ८ मृतदेह हाती लागले आहे.या धरणाशेजारी असलेल्या भेंडेवाडीतील जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. राज्यात यापूर्वीही अशा स्वरुपाच्या अनेक घटना घडल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा 12 जुलै 1961ला पुण्यात हाहाकार माजला होता, पाणशेत धरण फुटल्याने हजारो कुटुंबांवर भयानक संकट ओढावले होते. गेल्या 2 दिवसात राज्यभरामध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Jul 3, 2019, 2:09 PM IST

दुपारी २ पर्यंत महत्वाच्या बातम्या

तिवरे धरण फुटल्याने २३ जण गेले वाहून, ८ मृतदेह हाती; २ वर्षांपासून गळती होती सुरू

रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ८ मृतदेह हाती लागले आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. गुरं ढोर पाण्यात वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, २ वर्षांपासून धरणाची गळती सुरू होती. वारंवार तक्रार करूनही ती दुरस्त केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे....वाचा सविस्तर

आमचं इथं कोणीचं दिसना....काळरात्रीची घटना प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून

रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटले आणि होत्याचे नव्हते झाले. या धरणाशेजारी असलेल्या भेंडेवाडीतील जवळपास 12 ते 15 कुटुंबातील 24 माणसं बेपत्ता झाली. कामानिमित्त शहरात असलेले घटनेची माहिती कळताच रात्रीच घटनास्थळी आले. मात्र, त्यांना दिसला तो चिखल, वाहून गेलेली घरं, मोडलेले वासे. त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. कोणाचे आई-वडील गेले होते, तर कोणाचे भाऊ, कोणाचा मुलगा, मुलगी तर कोणाचं अख्य कुटुंबच वाहून गेलं होतं. आपलं कोणीच दिसत नाही, हे पाहून अनेकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकत होता....वाचा सविस्तर

पानशेत ते तिवरे व्हाया सावित्री; राज्यातल्या या आहेत 'महादुर्घटना'

मुंबई - चिपळूण तालुक्यातील नागरिकांसाठी मंगळवारची रात्र ही काळरात्र ठरली. तिवरे धरण फुटल्याने जवळपास २३ जण वाहून गेले होते. त्यापैकी ६ मृतदेह हाती लागले असून बचावकार्य सुरू आहे. राज्यात यापूर्वीही अशा स्वरुपाच्या अनेक घटना घडल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा 12 जुलै 1961ला पुण्यात हाहाकार माजला होता, पाणशेत धरण फुटल्याने हजारो कुटुंबांवर भयानक संकट ओढावले होते. त्यानंतरही राज्यात अनेक घटना घडल्या. या सर्व घटनांचा घेतलेला आढावा....वाचा सविस्तर

पावसाचा कहर: राज्यभरात गेल्या 48 तासात 50 बळी

मुंबई - गेल्या 2 दिवसात राज्यभरामध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश घटना या मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि नाशिकमध्ये घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळल्याने घरांचेही नुकसान झाले आहेत. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे....वाचा सविस्तर

लोणावळा राजमाची 'ट्रेल रण'; शंभरहून अधिक जणांनी घेतला सहभाग

पुणे -मोकळे आकाश असताना अनेक धावण्याच्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील परंतु, लोणावळा सारख्या पर्यटनस्थळी चक्क पावसाळ्यात 'लोणावळा राजमाची ट्रेल रण' ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत शंभरपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता...वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details