महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

आज...आत्ता ( बुधवार ३ जुलै २०१९ सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या )

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 22-24 जण बेपत्ता आहेत, दोघांचा मृतदेह सापडला आहे. आमची माणसं जेवायला बसली, ती उठूच शकली नाही, अशी प्रतिक्रिया तिवरे धरण दुर्घटनेत वडील आणि चुलते गमावलेल्या मुलाने व्यक्त केली.दरम्यान या घटनेनंतर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी भेंदवाडी या गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

By

Published : Jul 3, 2019, 9:06 AM IST

सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, दोघांचा मृतदेह सापडला, तर २४ जण बेपत्ता

रत्नागिरी -चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 22-24 जण बेपत्ता आहेत, दोघांचा मृतदेह सापडला आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. गुरं ढोर पाण्यात वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी, नायब तहसीलदार व प्रशासनाच्या इतर कर्मचाऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली....वाचा सविस्तर

तिवरे धरणफुटी प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल - जिल्हाधिकारी

रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 22 जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर तत्काळ बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी सुरू केलेल्या शोध कार्यात दोघांचे मृतदेह सापडले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. तिवरे भेंदवाडीतील काही घरं पाण्याखाली गेली आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी भेंदवाडी या गावाला भेट दिली. आणि परिस्थितीचा आढावा घेतला....वाचा सविस्तर

तिवरे धरण दुर्घटना : 'आमची माणसं जेवायला बसली ती उठूच शकली नाही'

रत्नागिरी- आमची माणसं जेवायला बसली, ती उठूच शकली नाही, अशी प्रतिक्रिया तिवरे धरण दुर्घटनेत वडील आणि चुलते गमावलेल्या मुलाने व्यक्त केली. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून जवळपास 22-24 जण बेपत्ता आहेत. यापैकी दोघांचा मृतदेह सापडला आहे. रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली....वाचा सविस्तर

मुंबई : मध्य रेल्वेवर आज रविवार प्रमाणेच राहणार वेळापत्रक

मुंबई - हायटाईड व हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर बुधवारीही (3 जुलै) मध्य रेल्वेवर रविवार प्रमाणेच वेळापत्रक लागू राहणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास उपनगरीय मार्गावर विशेष गाड्या चालविल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे....वाचा सविस्तर

चिली-अर्जेंटिनामध्ये असे दिसले सूर्यग्रहण...पाहा फोटो,

नवी दिल्ली - जगातील काही भागांत सूर्य ग्रहणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले आहे. सूर्य ग्रहणाच्यावेळी सूर्य पूर्णपणे गडद झाला होता. चिली, अर्जेंटिना आणि ब्राझिलच्या काही भागांमधून हे सूर्यग्रहण पाहायला मिळाले आहे. रात्र असल्यामुळे भारतामध्ये हे ग्रहण पाहायला नाही मिळाले...वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details