महाराष्ट्र

maharashtra

Nagpanchami 2022 : काय आहे नागलोकातील रहस्य ?; काय तिथे पोहचलेला माणुस येतो परत ?...

By

Published : Aug 1, 2022, 5:49 PM IST

देशात नागलोकला जाण्यासाठी 5 मार्ग दिलेले आहेत. इथे Etv Bharat तुम्हाला त्या मार्गा बाबत आणि नागलोक मानल्या जाणार्‍या रहस्यमय घटनांबाबत माहिती देत आहे. इतकेच नाही तर, ज्या मंदिराला नागलोकाची गुहा म्हणतात आणि जिथे नागराज वेगवेगळ्या रूपात दिसतात. त्या मंदिरालाही तुम्ही भेट द्या; त्याला 'नागचंद्रेश्वर मंदिर' (Nagchandreshwar Temple) असेही म्हणतात. त्याचवेळी तुम्हाला सापांचे दर्शनही होईल. पण ते साप मानवाला फारसे हानी पोहोचवत नाहीत. चला तर मग या नागपंचमीला (Nagpanchami 2022) जाणुन घेऊया (What is the secret of Nagaloka) काय आहे नागलोक...

nagchandreshwar temple
नागचंद्रेश्वर मंदिर

नागपंचमी 2022 : (Nagpanchami 2022) भारतात नागपंचमीबद्दल अनेक समजुती आणि प्रथा आहेत. परंतु आज Etv Bharat तुम्हाला जे मंदिर दाखवत आहे; जिथे जाण्यासाठी तुम्हाला (What is the secret of Nagaloka) अधोलोकातून जावे लागते. इथला प्रवास सोपा नाही, पण माणूस आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होईल, या आशेने इथे जातो. 'नागचंद्रेश्वर मंदिर' (Nagchandreshwar Temple) हे मंदिर मध्य प्रदेशातील सातपुडा खोऱ्यात आहे. इथे जाण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण इथले रस्ते खूप अवघड आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची पातळी कमी होते. पण जेव्हा एखादी व्यक्ती इथे पोहोचते, तेव्हा त्याला जगातील दुर्मिळ ठिकाणे पाहायला मिळतात. चित्रांद्वारे, मंदिराच्या बाहेरील आणि आतील लेण्यांचे दृश्य आपण पाहू शकता. इथे अधोलोकाचा (Amazing Naglog Temple) मार्ग डोंगराच्या मधोमध आहे.

नागलोकाची गुहा

मध्य प्रदेशातील सातपुडा (naglok caves satpura jungle) टेकड्या देशातील सर्वात जुन्या टेकड्या मानल्या जातात. इथून एक रस्ता नागलोकाकडे जातो. जो खूप अवघड आहे. प्रवास संपवून प्राचीन नागलोकाचे दर्शन झाले की;माणसाचा कालसर्प दोष दूर होतो, असे मानले जाते. वाटेत नागमणी नावाचे मंदिर आहे; जिथे लोकांचे चढून जाणे फार कठीण असल्याने, या मार्गाला (The man who has reached there comes back) अधोलोकाचा मार्ग असेही (Amazing Naglog Temple) म्हणतात. कारण रस्ता अतिशय अवघड आणि अरुंद आहे. जातांना अनेक गुहा असून, वाटेत अनेक अडचणी आहेत. वाटेत जातांना तुम्हाला सर्वत्र साप रांगताना दिसतील. हे बघुनच अनेकजण घाबरतात. अनेक लोक हे अडथळे पार करण्याची हिंमत करीत नाहीत. तर काही प्रवास पूर्ण करून, आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात. मार्ग ओलांडणाऱ्यालाच नागलोकाचे दुर्मिळ दर्शन घडते.

Nagpanchami 2022

आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, अशी परिस्थिती पाहून लोक सहसा घाबरतात. पण हे साप कधीच कोणाला इजा करत नाहीत. या मार्गावर आजपर्यंत, सर्पदंशामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. नागलोकाचा राजा स्वतः खऱ्या मनाने जाणाऱ्या भक्तांचे रक्षण करतो; अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे भाविक त्यांचे आशीर्वाद मिळवतात. येथे पोहोचल्यानंतर नागपंचमीच्या दिवशी लोक पूजा करतात आणि विशेष पुजा-अर्चेत सहभागी होतात.

नागलोकाची गुहा

या वाटेवर एवढ्या उंच टेकड्या आहेत की, लोक नुसते बघत राहतात. मात्र, जेव्हा त्यांना खरोखरच तिथे चढावे लागते, तेव्हा वाट खूप अवघड होऊन जाते. अनेक ठिकाणी विश्रांतीसाठी तंबूची व्यवस्थाही केली आहे. हा रस्ता वर्षातून एकदाच सर्वसामान्यांसाठी खुला केल्या जातो. वाघांपासून ते अनेक जंगली प्राणी या परिसरात आढळतात. येथील रस्ते अगदी दुर्गम आहेत. नागपंचमीच्या दिवशी लोकांना या ठिकाणी जाण्याची परवानगी असते. येथे अनेक गुहा आहेत ज्या 100 ते 150 फूट खोल आहेत.

नागलोकाची गुहा

याशिवाय छत्तीसगडच्या डोंगरांमधूनही एक रस्ता जातो. जशपूरमध्ये एक रस्ता आहे; ज्याचे नाव तापकारा आहे. या ठिकाणी सापांच्या बहुतांश प्रजाती दिसतात. ते सापही अत्यंत धोकादायक आहेत. तपकारा अनेक रहस्यमय गोष्टींनी भरलेला असल्यामुळे, येथील गुहांमध्ये मानवांना प्रवेश करण्यास मनाई आहे. ज्याने कोणी आतापर्यंत त्यात प्रवेश केला, तो जिवंत परत आला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही लेणी बंद करण्यात आली आहे. राम आणि सीतेच्या आगमनाची कथाही येथे प्रचलित आहे. मात्र सध्या तेथे मानवांना प्रवेश पूर्णपणे बंदी आहे.

नागलोकाची गुहा

नागचंद्रेश्वर मंदिरात गेल्याने माणसाचा कालसर्प दोष दूर होतो, अशी मान्यता आहे. पण नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्याचे काही मार्ग आहेत, ज्यांचे पालन केल्यास देखील कालसर्प दोष दूर होतो. यावेळी नागपंचमी 2 ऑगस्टला आहे. त्यामुळे तुम्ही नागलोकात जात असाल किंवा कोणत्याही मंदिरात जात असाल, तर तुम्हाला काही खास गोष्टी जाणून घ्याव्या लागेल. नागपंचमीला स्नान करून भगवान भोले भंडारी शिवशंभूचे दर्शन व ध्यान करावे. त्यांचा अभिषेक करावा. त्यावर बेलाची पाने व फुले एकत्र अर्पण करावे. हळदीसह चांदीचे नाग आणि फुले, तांदूळ आपल्याजवळ ठेवा आणि तेही तिथे अर्पण करा. चांदीचा नाग अर्पण करणे शक्य नसल्यास, शिवपिंडावर धातुचा नाग अभिषेक करुन अर्पण करावा. कच्च्या दुधानेअभिषेक करण्याची परंपरा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय नागराजाची पूजा करू नये. कारण नाग हे भोलेनाथाची शोभा मानले जाते. म्हणजेच प्रथम बाबा भोलेनाथाचे दर्शन घेतल्यानंतरच नागदेवतेची पूजा करावी.

हेही वाचा :Shravan Begins Today : श्रावण महिना आजपासून सुरू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

ABOUT THE AUTHOR

...view details