महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Anurag Thakur On OTT : सर्जनशीलतेच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही - अनुराग ठाकूर - अनुराग ठाकूर

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वाढती अश्लीलता आणि द्वेषपूर्ण भाषणाबद्दल संवाद साधला. त्यांनी या विषयावर सरकारचे गांभीर्य देखील व्यक्त केले. तसेच यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज भासली तरी सरकार मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.

Anurag Thakur
अनुराग ठाकूर

By

Published : Mar 20, 2023, 9:34 AM IST

नवी दिल्ली :ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वाढत्या अश्लीलतेवर केंद्रीय माहिती प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'सरकार या विषयांवर खूप गंभीर आहे. आता सर्जनशीलतेच्या नावाखाली असभ्य भाषा खपवून घेतली जाणार नाही'.

गरज भासल्यास आवश्यक बदल करणार : ते पुढे म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद आणि अश्लील मजकूर वाढत असल्याच्या तक्रारींबाबतही सरकार गंभीर आहे. यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज भासल्यास त्यावर विचार करण्याची मंत्रालयाची तयारी आहे. या व्यासपीठांना अश्लीलतेचे नव्हे तर सर्जनशीलतेचे स्वातंत्र्य दिले गेले. यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याची गरज भासली तरी सरकार मागे हटणार नाही'.

'बहुतेक तक्रारी निर्मात्यांकडूनच सोडवल्या जातात' : अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'आत्तापर्यंतची प्रक्रिया अशी आहे की, निर्मात्याला प्रथम त्यांच्या स्तरावर आलेल्या तक्रारींचे निराकरण करावे लागते. 90 ते 92 टक्के तक्रारी त्यांच्याकडूनच आवश्यक बदल करून सोडवल्या जातात. तक्रार निवारणाची पुढील पातळी त्यांच्याकडून प्राप्त समर्थनावर अवलंबून असते. तेथे बहुतेक तक्रारींचे निराकरण केले जाते. शेवटच्या स्तरावर, प्रशासनाची आवश्यकता भासते. येथे विभागीय समिती स्तरावर नियमांनुसार कारवाई केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी तक्रारी वाढू लागल्या असून विभागाकडून त्याची गंभीर दखल घेतली जात आहे. बदलाची गरज भासल्यास त्याचा गांभीर्याने विचार करण्याची आमची तयारी आहे'.

'बॉयकॉट ट्रेंड'चा निषेध : गेल्या महिन्यात अनुराग ठाकूर यांनी चित्रपटांना लक्ष्य करणाऱ्या 'बॉयकॉट ट्रेंड'चा निषेध केला होता. ते म्हणाले होते की, भारत 'सॉफ्ट पॉवर' म्हणून आपला प्रभाव वाढवण्यास उत्सुक आहे, मात्र अशा घटनांमुळे वातावरण बिघडते. ते म्हणाले की, जर कोणाला चित्रपटाबाबत काही समस्या असेल तर त्याची संबंधित सरकारी विभागाशी चर्चा करण्यात यावी. भारतीय चित्रपटांचा प्रभाव जगभरात आहे, याचा 'बॉयकॉट ट्रेंड' वाल्यांनी विचार करावा'.

हेही वाचा :Malaika Arora on Marriage Plan : अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाच्या प्लॅनवर मलायका अरोरा म्हणाली - मला माहित आहे की तो माझा आहे...

ABOUT THE AUTHOR

...view details