महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : कर्नाटकातील जालियानवाला बाग विदुरश्वतामध्ये काय झाले होते? जाणून घ्या

कर्नाटकमधील विदुरश्वता येथे तिरंगा ध्वज सत्याग्रहादरम्यान 25 एप्रिल 1938 रोजी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात 32 स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले होते. जालियानवाला बाग घटनेशी साधर्म्य असल्याने याला कर्नाटकचे जालियानवाला बाग म्हणून ओळखले जाते. जालियानवाला बाग हत्याकांडानंतर 19 वर्षांनी विदुरश्वता इथे ही घटना घडली. दक्षिणेतील स्वातंत्र्य लढ्यात ही घटना अतिशय महत्वाची ठरली. या घटनेनंतर स्वातंत्र्य लढ्यातही अनेक बदल दिसून आले. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना या घटनेविषयी जाणून घेऊया या खास रिपोर्टच्या माध्यमातून..

By

Published : Aug 15, 2021, 6:03 AM IST

Updated : Aug 15, 2021, 6:17 AM IST

स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव : कर्नाटकातील जालियानवाला बाग विदुरश्वतामध्ये काय झाले होते? जाणून घ्या
स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव : कर्नाटकातील जालियानवाला बाग विदुरश्वतामध्ये काय झाले होते? जाणून घ्या

हैदराबाद :कर्नाटकमधील विदुरश्वता येथे तिरंगा ध्वज सत्याग्रहादरम्यान 25 एप्रिल 1938 रोजी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात 32 स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले होते. जालियानवाला बाग घटनेशी साधर्म्य असल्याने याला कर्नाटकचे जालियानवाला बाग म्हणून ओळखले जाते. जालियानवाला बाग हत्याकांडानंतर 19 वर्षांनी विदुरश्वता इथे ही घटना घडली. दक्षिणेतील स्वातंत्र्य लढ्यात ही घटना अतिशय महत्वाची ठरली. या घटनेनंतर स्वातंत्र्य लढ्यातही अनेक बदल दिसून आले. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना या घटनेविषयी जाणून घेऊया या खास रिपोर्टच्या माध्यमातून..

स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव : कर्नाटकातील जालियानवाला बाग विदुरश्वतामध्ये काय झाले होते? जाणून घ्या

विदुरश्वतामध्ये आयोजित केला तिरंगा ध्वज सत्याग्रह

स्वातंत्र्याच्या आंदोलनादरम्यान काँग्रेसकडून प्रत्येक आयोजनादरम्यान तिरंगा ध्वज फडकवला जात होता. स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून या ध्वजाकडे बघितले जात होते. ब्रिटिशांनी बंदी घातल्यानंतरही शिवपूरमधील मंड्या येथे आयोजित तिरंगा ध्वज सत्याग्रह यशस्वी ठरला होता. अशाच पद्धतीने कर्नाटकातील विदुरश्वत्तामध्ये तिरंगा ध्वज सत्याग्रह आयोजित केल्यास अनेक लोक काँग्रेसकडे आकर्षित होतील असे काँग्रेस नेत्यांना तेव्हा वाटले होते. मात्र हा सत्याग्रह थोपविण्यासाठी पोलिसांनी एक महिना आधीच तयारी केलेली होती. 1938 च्या एप्रिल महन्यातील 25 तारखेला ध्वजारोहणासाठी एकत्र आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 32 स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले.

स्वातंत्र्य लढ्याला दिली नवी दिशा

या घटनेने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा देण्याचे काम केले असे इतिहास अभ्यासक प्रा. गंगाधर यांचे म्हणणे आहे. "जुन्या मैसूर संस्थानमधील शिवपुरामध्ये प्रथमच ध्वज सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिशांनी यावर बंदी घातल्यानंतरही तो यशस्वी झाला होता. मैसूर संस्थानमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. या घटनेने स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा देण्याचे काम केले." असे मत प्राध्यापक गंगाधर यांनी व्यक्त केले आहे.

कर्नाटकचे जालियानवाला बाग

पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांडाच्या घटनेनंतर 19 वर्षांनी विदुरश्वता येथे गोळीबाराची ही घटना घडली होती. जालियानवाला बागमध्ये जसे बाहेर पडण्यासाठी छोटीशीच जागा होती, अगदी तसेच विदुरश्वता इथल्या आंदोलनस्थळीही बाहेर पडण्यासाठी छोटीशीच जागा होती. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास आतील लोकांना बाहेर जाता येत नव्हते आणि पोलिसांनी हॉलच्या खिडक्यांमधून गोळीबार केला. जालियानवाला बागशी असलेल्या साधर्म्यामुळे विदुरश्वताला नंतर कर्नाटकचे जालियानवाला बाग म्हणून ओळखले जाऊ लागले.

बीबीसीनेही दिले विदुरश्वता गोळीबाराचे वृत्त

विदुरश्वता गोळीबाराचे वृत्त बीबीसीनेही दिले होते. तेव्हा गांधीजी मुंबईत होते. सरदार पटेल आणि आचार्य कृपलानी यांना विदुरश्वताला पाठविण्यात आले. काँग्रेसच्या ध्वजासोबतच ब्रिटिश ध्वज फडकाविण्यासाठी मिर्झा-पटेल करार आधीच झालेला होता. हा ध्वज स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक होता. ध्वज समोर ठेवून आंदोलन करण्याची काँग्रेसची महात्वाकांक्षा होती. विदुरश्वता घटनेनंतर केवळ ब्रिटिशांविरोधातच नव्हे तर ब्रिटिशांच्या अधीन असलेल्या संस्थानांविरोधात लढा देण्याचा संदेश काँग्रेसजनांना मिळाला. मैसूर मोहीम याचाच एक भाग होता असे प्रा. गंगाधर यांनी सांगितले.

विदुरश्वता घटनेनंतर गांधीजींनी दिले संस्थानांविरोधात लढण्याचे निर्देश

गोळीबाराच्या घटनेपूर्वी काँग्रेस थेट ब्रिटिश राजवटीविरोधात लढा देत होती. संस्थानांविरोधात न लढण्याचे निर्देश गांधीजींनी दिलेले होते. मैसूरचे महाराज आणि मिर्झा इस्माईल यांच्या संस्थानाविषयी गांधीजींना आपुलकी होती. मात्र विदुरश्वता घटनेनंतर त्यांचे मत बदलले. गांधीजींनी केवळ ब्रिटिशांविरोधातच नव्हे तर ब्रिटिशांना अधीन असलेल्या संस्थानांविरोधात लढण्याचे आवाहन यानंतर केले. हे एक महत्वाचे पाऊल होते. गांधीजींनी देशभर काँग्रेसकडून आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला, यामागे विदुरश्वता हेच कारण होते.

हेही वाचा -स्वातंत्र्यदिन विशेष : बिलासपूरचे 'हे' कुटुंब दररोज का फडकावते तिरंगा?

Last Updated : Aug 15, 2021, 6:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details