महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Har Ghar Tiranga : 'हर घर तिरंगा' बाइक रॅलीत मनोज तिवारी विना हेल्मेट सहभागी; आता भरणार चालान - Manoj tiwari

'आझादी का अमृत महोत्सवा'चा ( Azadi ka Amrit Mahotsav ) एक भाग म्हणून बुधवारी लाल किल्ल्यावरून संसद भवनापर्यंत काढण्यात आलेल्या भाजपच्या 'तिरंगा बाईक रॅली'मध्ये ( tiranga Bike rally ) भाजप खासदार मनोज तिवारी हेल्मेटशिवाय सहभागी झाले ( mp manoj tiwari in tiranga bike rally ) होते. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर त्याने आपली चूक मान्य करत माफी मागितली. ( Har Ghar Tiranga )

mp manoj tiwari in tiranga bike rally
मनोज तिवारी

By

Published : Aug 3, 2022, 4:34 PM IST

नवी दिल्ली :उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू ( Vice President Vyankya Naidu ) यांनी बुधवारी सकाळी लाल किल्ला ते दिल्लीतील विजय चौकापर्यंत 'हर घर तिरंगा' बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. तिरंगा बाइक रॅलीमध्ये सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार सहभागी झाले होते. या रॅलीचे आयोजन सांस्कृतिक मंत्रालयाने केले असून वरिष्ठ नेत्यांसोबतच शेकडो लोकही यात सहभागी झाले होते. सर्वांनी आपापल्या दुचाकींवर तिरंगा लावला आणि रॅलीचा भाग झाला.

मनोज तिवारी यांचे ट्वीट

बाईक रॅलीमध्ये सर्व केंद्रीय मंत्री स्वत: बाइक, स्कूटी चालवून रॅलीत सहभागी झाले होते, तर काही खासदार आणि मंत्री दुचाकीवरमागे बसून लाल किल्ला ते विजय चौक या रॅलीत सहभागी झाले. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू म्हणाले की, 'लाल किल्ल्यावरून तिरंगा यात्रा काढली जात आहे, आम्ही संसद सदस्य आहोत, सामान्य जनता आमच्याकडे पाहत आहे, आम्हाला त्यांच्यासमोर उदाहरण ठेवायचे आहे.'

मनोज तिवारी हेल्मेटशिवाय सहभागी - 'आझादी का अमृत महोत्सवा'चा एक भाग म्हणून बुधवारी लाल किल्ल्यावरून संसद भवनापर्यंत काढण्यात आलेल्या भाजपच्या 'तिरंगा बाईक रॅली'मध्ये भाजप खासदार मनोज तिवारी हेल्मेटशिवाय सहभागी झाले होते. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर त्याने आपली चूक मान्य करत माफी मागितली.

'विजयी विश्व तिरंगा प्यारा' -भाजप खासदार मनोज तिवारी यांनी हेल्मेटशिवाय बाईक रॅलीत सहभागी होणे चुकीचे असल्याचे मान्य केले. त्यासाठी वाहतूक विभागाने निश्चित केलेले चलन भरण्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याने आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली आहे. तिरंगा बाइक रॅलीदरम्यान मनोज तिवारी यांनी "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊंचा रहे हमारा" हे गाणेही गायले. ते म्हणाले- हर घर तिरंगा, घर-घर तिरंगा. आमच्यासाठी देश पक्षाआधी आहे.

हर घर तिरंगा मोहिम - देशाच्या एकात्मतेसाठी, देशासाठी बलिदान दिलेल्या महान व्यक्तींचे स्मरण करा, आपल्या मुलांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दल सांगा, त्यांचे योगदान लक्षात ठेवा. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राष्ट्रध्वजाचा आदर आणि समर्पणाची मोहीम आहे.

ही मोहिम 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशासह श्योपूर जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान मुख्य मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये सर्व नागरिक आपापल्या घरी ध्वजारोहण करतील. 'हर घर तिरंगा' मोहिमेला लोकप्रिय करण्यासाठी भाजपने पक्षाच्या युवा शाखेच्या नेत्यांना सकाळी 9 ते 11 या वेळेत 'प्रभातफेरी' काढण्यास आणि दुचाकीवरून तिरंगा यात्रा काढण्यास सांगितले आहे. पक्षातर्फे 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान बूथ स्तरापर्यंत 'प्रभातफेरी' काढण्यात येणार असून, त्यादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आवडते भजन 'रघुपती राघव राजा राम' आणि 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत गायले जाईल.

हेही वाचा -Supreme Court Hearing : लोकशाहीच्या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय व्हावं - घटनातज्ज्ञ उल्हास बापट

ABOUT THE AUTHOR

...view details