महाराष्ट्र

maharashtra

खासदारांच्या पेन्शनबाबत वरुण गांधी यांचे मत वैयक्तिक; नरेंद्र सिंह तोमर यांची प्रतिक्रिया

By

Published : Jun 28, 2022, 3:38 PM IST

भाजप खासदार वरुण गांधी यांच्या आक्रमक आणि केंद्र सरकारविरोधी वृत्तीमुळे भाजपच्या बड्या नेत्यांना अनेकवेळा अस्वस्थ परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. अलीकडेच त्यांनी खासदारांना पेन्शन सोडण्याचा सल्ला दिला आहे. ( Union Minister Narendra Singh Tomar Said) खासदार वरुण गांधींच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे वरुण गांधी यांचे वैयक्तिक मत असून त्यांना रोज असे मत व्यक्त करणे आवडते.

नरेंद्र सिंह तोमर
नरेंद्र सिंह तोमर

ग्वालियर -भाजप खासदार वरुण गांधी यांच्या आक्रमक आणि केंद्र सरकारविरोधी वृत्तीमुळे भाजपच्या बड्या नेत्यांना अनेकवेळा अस्वस्थ परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. ( Narendra Singh Tomar ) अलीकडेच त्यांनी खासदारांना पेन्शन सोडण्याचा सल्ला दिला आहे. खासदार वरुण गांधींच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे वरुण गांधी यांचे वैयक्तिक मत असून त्यांना रोज असे मत व्यक्त करणे आवडते.

नरेंद्र सिंह तोमर यांची प्रतिक्रिया

भाजप खासदार वरुण गांधीयांनी खासदारांच्या पेन्शनबाबत केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वरुण गांधी यांच्या वक्तव्याबाबत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. कोणीही वैयक्तिक मत मांडण्यास मोकळे आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर फार काही बोलता येणार नाही असही ते म्हणाले आहेत.

भाजप खासदार वरुण गांधी म्हणाले की, सर्व खासदारांनी पेन्शन बंद करावी. जेणेकरून अग्निवीरांच्या पेन्शनचा मार्ग सुकर होईल. वरुण गांधी यांनी ट्विट करून म्हटले होते की, भारतातील महान लोकांनी कधी स्वच्छतेसाठी कर भरला तर कधी गरजूंना गॅस मिळाला, त्यामुळे त्यांची सबसिडी दिली आहे. या बलिदानातून प्रेरणा घेऊन आपण सर्व देशभक्त खासदार आपल्या पेन्शनचा त्याग करून सरकारचा भार कमी करू शकत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजप खासदार वरुण गांधी हे अनेक दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज आहेत. ते सतत मोदी सरकारला अडचणीत आणत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या काळातही वरुण गांधी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. त्यांच्याच पक्षाच्या खासदाराच्या आक्रमक आणि सरकारविरोधी वक्तव्यामुळे भाजप नेत्यांना अनेकवेळा अस्वस्थ परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा -Gujarat Government: केजरीवाल सरकारचे विकास मॉडेल पाहायला 'गुजरात भाजपची' दिल्ली वारी

ABOUT THE AUTHOR

...view details