लखनौ - शहरांची नावे बदलण्यात येणाऱ्या योगी सरकारने इतिहासातील घटनेचे नाव बदलले आहे. इंग्रज राजवटीतील काकोरी कांड ऐवजी काकोरी ट्रेन अॅक्शन हे नाव उत्तर प्रदेश सरकारने बदलले आहे. कांड हे नाव अपमानास्पद असल्याने बदलण्यात येत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.
भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे म्हणजे अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी काकोरी ट्रेन अॅक्शन अंतर्ग चौरी चौरा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काकोरी शहीद स्मारक येथे स्वातंत्र्यवीर रोशन सिंह, रामप्रसाद बिस्मिल आणि राजेंद्र लाहिरी यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. यावेळी विविध मंत्री आणि अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
हेही वाचा-मोदींकडून 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी जमा, किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता मिळाला