महाराष्ट्र

maharashtra

उत्तर प्रदेशमधील लॉकडाऊन वाढवला; ३१ मेपर्यंत राहणार निर्बंध

By

Published : May 23, 2021, 6:42 AM IST

"राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी उत्तर प्रदेश सरकार कटिबद्ध आहे. यामुळेच आम्ही सध्या लागू असलेला अंशतः लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन सुरू करताच आपल्याला याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. आता या लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे." असे सरकारने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

UP extends COVID curfew till May 31
उत्तर प्रदेशमधील लॉकडाऊन वाढवला; ३१ मेपर्यंत राहणार निर्बंध

लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. हा लॉकडाऊन आता ३१ मे सकाळी सात वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. प्रशासनाने शनिवारी याबाबत माहिती दिली.

"राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी उत्तर प्रदेश सरकार कटिबद्ध आहे. यामुळेच आम्ही सध्या लागू असलेला अंशतः लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन सुरू करताच आपल्याला याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले होते. आता या लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे." असे सरकारने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

"राज्यातील नागरिकही या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. राज्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळेच हा लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहतील. बाकी आस्थापने बंद राहणार आहेत." असेही या पत्रकात सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १५ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले होते. यातच २४ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात ५ मे पासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यापूर्वी राज्यसरकारने वीकेंड कर्फ्यू लागू केले होते.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६,०४६ नव्या कोरोना रुग्णांची, तर २२६ कोरोना बळींची नोंद करण्यात आली. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये १७ हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९४ हजार ४८२ आहे.

हेही वाचा :कर्नाटकात एकाच कुटुंबातील 6 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details