हमीरपुर Hamirpur Crime News : रथ कोतवालीच्या लीलावतीनगर पठाणपुरा परिसरात रविवारी (26 नोव्हेंबर) पहाटे धक्कादायक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका व्यक्तीनं चक्क त्याच्या पत्नीसह सासऱ्याचा खून केला. इतकचं नाही तर त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणानंतर नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कायम व्हायचे वाद :मिळालेल्या माहितीनुसार, मुस्करा पोलीस स्टेशन हद्दीतील पहारी भिटारी गावात राहणारे ओमप्रकाश राजपूत (42) हे त्यांची पत्नी अनुसुया (40), मुलगी केबीसी (17), जुली (12) आणि मुलगा प्रिन्स (10) यांच्यासोबत राहत होते. पती-पत्नीमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद व्हायचे. त्यामुळे पत्नी अनुसुया आपल्या तीन मुलांसह रथ कोतवाली परिसरातील लीलावती नगर पठाणपुरा परिसरात गेल्या पाच महिन्यांपासून राहायला गेल्या होत्या.
मुलीची प्रतिक्रिया : जीआरव्ही इंटर कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या केबीसीनं सांगितलं की, मागील काही महिन्यापासून ती शहरातील लीलावती नगर पठाणपुरा येथे तिच्या आई अन् बहीण, भावासह राहते. काही दिवसांपूर्वीच लोदीपुरा येथे राहणारे त्यांचे आजोबा नंदकिशोर (वय 60) हे देखील त्यांच्या येथे राहण्यासाठी आले होते. शनिवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडील ओमप्रकाश राजपूत यांचे मित्र रतनलाल वर्मा (वय 55,उच्च प्राथमिक शाळा भिटारीचे मुख्याध्यापक) हे घरी आले अन् तेथेच मुक्कामी थांबले, असं केबीसीनं सांगितलं.