महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Food Poisoning in Pratapgarh : अन्नातून विषबाधा झाल्याने संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल, तर दोन मुलांचा मृत्यू

प्रतापगडमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ( Incident of food poisoning in Pratapgarh ) समोर आली आहे. शनिवारी रात्री कुटुंबाने एक वर्ष जुनी वाळलेली भिंडी शिजवून खाल्ली होती. यानंतर सर्वांना उलट्या, जुलाब सुरू झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला तर पाच सदस्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

By

Published : Jun 19, 2022, 8:17 PM IST

Food Poisoning in Pratapgarh
Food Poisoning in Pratapgarh

प्रतापगड: जिल्हा रुग्णालयात अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रारीनंतर दाखल करण्यात ( Whole family admit in hospital ) आलेल्या, एकाच कुटुंबातील 4 मुलांपैकी दोन मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू ( (Two children died of food poisoning) झाला. दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. कुटुंबातील अन्य तीन सदस्यांवर घंटाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

अन्नातून विषबाधा झाल्याने संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल

घंटाली पोलीस ठाण्याचे अधिकारी सोहनलाल यांनी सांगितले की, नालपाडा ग्रामपंचायतीच्या मांडव जेल गावात राहणाऱ्या भुरीबाई यांची मुलगी गुड्डी ही चार मुलांसह घरी आली होती. 18 जून रोजी संध्याकाळी गुड्डीने स्वयंपाक केला. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी जेवणही केले. थोड्या वेळाने सर्वांची प्रकृती ढासळू लागली. प्रत्येकाला उलट्या, जुलाब, मळमळ अशा समस्या येऊ लागल्या. यावर ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना घंटाली ( Incident of poisoning in Ghantali village ) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

येथे 4 मुलांची प्रकृती चिंताजनक ( children is Condition critical ) झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान 2 वर्षांची मुलगी ललिता आणि 6 वर्षांचा मुलगा छोटू यांचा मृत्यू झाला. तर 2 मुले अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. कुटुंबातील अन्य तीन जणांवर घंटाळी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

पोलिस अधिकारी सोहनलाल ( Police Officer Sohanlal ) यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्यांनी गेल्या पावसात वाळलेली भेंडीची भाजी शिजवून खाल्ली होती. अशा परिस्थितीत कदाचित त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या निर्माण होऊन, संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य बिघडले असावे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृत मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा -Justice S. S Shinde: न्यायमूर्ती एस. एस शिंदे यांची राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details