महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Troubled By Eunuchs Two Brothers Jumped From Train तृतीयपंथीयांच्या त्रासामुळे रेल्वेतून मारली उडी, दोघांचा मृत्यू - Troubled By Eunuchs Two Brothers Jumped From Train

सवाई माधोपूर रेल्वे स्थानकावर तृतीय पंथीयांच्या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी रेल्वेतून बाहेर उडी ( Troubled By Eunuchs Two Brothers Jumped From Train ) घेतली. मात्र, त्याच दरम्यान दुसऱ्या रेल्वे रुळावरून वेगाने येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी तृतीय पंथीयांमुळे हा अपघात घडला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

two youths got off the train
two youths got off the train

By

Published : Sep 10, 2022, 7:54 PM IST

सवाई माधोपूररेल्वे स्थानकावर तृतीयपंथीयांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी मध्यरात्री अशाच त्रासामुळे एक दुर्दैवी घटना घडली. कोटा-हिसार पॅसेंजर ट्रेनमधून रिंगास येथे जाण्यासाठी तीन तरुण रेल्वेत चढले. मात्र, रेल्वेत असलेल्या तृतीयपंथीयांसोबत त्यांचे भांडण झाले. तृतीयपंथीयांच्या त्रासापासून स्वतःची सुटका करण्यासाठी तिघांनी रेल्वेतून उड्या ( Troubled By Eunuchs Two Brothers Jumped From Train ) घेतल्या. मात्र, दुसऱ्या ट्रॅकवरून त्याचवेळी वेगाने दुसरी रेल्वे गेली. या रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांचा जीव गेला.

या संपूर्ण घटनेबाबतरेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे वेगळेच आहे. ही घटना तृतीयपंथीयांशी झालेल्या भांडणातून नव्हे तर चुकीच्या बाजूने ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नातून घडली आहे. तथापि, मृताचा सहप्रवासी अनिल याने सांगितले की, ते तिघे रात्री कोटा-हिसार पॅसेंजर ट्रेनने रिंगास येथे खाटू श्यामजी यांना भेटायला जात होते. सवाई माधोपूर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढताच त्यांना आत तृतीयपंथी दिसले. ट्रेनमध्ये शिरताच त्यांच्यात भांडण सुरू झाले. तृतीयपंथीयांना तिघांनाही ट्रेनमधून उतरण्यास भाग पाडले.

अनिल, ओमप्रकाश सैनी आणि फुलचंद सैनीहे तिघे रेल्वेमधून खाली उतरताच अचानक दुरांतो रेल्वे दुसऱ्या रुळावरून गेली. तिची धडक ओमप्रकाश सैनी आणि फूलचंद सैनी यांना बसल्याने दोघेही जागीच मृत्यूमुखी पडले. माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठविले.

या घटनेबाबत प्रवासी अनिल यांचे म्हणणे आहे की, तृतीयपंथीयांशी झालेल्या भांडणामुळे त्यांना ट्रेनमधून उतरावे लागले आणि हा अपघात झाला. तर स्टेशन प्रभारी धरम सिंह यांनी सांगितले की, प्रवासी चुकीच्या बाजूने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचवेळी दुरंतो ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवर आल्याने ही घटना घडली. कोटा रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विजय प्रकाश पंडित यांनी सांगितले की, या घटनेत तृतीयपंथीयांशी कसल्याही प्रकारचे भांडण झालेले नाही. असे असले तरी आम्ही या घटनेची सखोल चौकशी करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details