महाराष्ट्र

maharashtra

30 Days Mobile Recharge Plans : प्रीपेड रिचार्ज 28 नव्हे 30 दिवस चालणार, ट्रायचे दूरसंचार कंपन्यांना आदेश

By

Published : Jan 29, 2022, 3:25 PM IST

ग्राहकांना 30 दिवसांचे रिजार्ज मिळत असल्याने ग्राहकांचे वर्षभराती प्लॅनम कमी होण्याची शक्यता आहे. सर्वच दूरसंचार कंपन्यांकडून 28 दिवसांचे रिचार्ज प्लॅन दिले जातात. त्यामुळे ग्राहकांना वर्षभरात 13 रिजार्च करावे लागतात. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना दिलेल्या आदेशात म्हटले, की प्रत्येक दूरसंचार कंपनी 30 दिवसांची वैधता देणारे ( plan validity of thirty days ) व्हाउचर देईल.

दूरसंचार ऑपरेटर
दूरसंचार ऑपरेटर

नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ( ट्राय ) दूरसंचार ऑपरेटरच्या ( TRAI order to telecom operators on plans ) प्रिपेड ग्राहकांकरिता दिलासादायक निर्णय घेतला आहे. ग्राहकांना 28 दिवसांचे रिचार्ज न देता 30 दिवसांचे रिचार्ज देण्याचे ट्रायने दूरसंचार ( mobile recharge plans with 30 day validity ) कंपन्यांना आदेश दिले आहेत.

ग्राहकांना 30 दिवसांचे रिजार्ज मिळत असल्याने ग्राहकांचे वर्षभराती प्लॅनम कमी होण्याची शक्यता आहे. सर्वच दूरसंचार कंपन्यांकडून 28 दिवसांचे रिचार्ज प्लॅन दिले जातात. त्यामुळे ग्राहकांना वर्षभरात 13 रिजार्च करावे ( prepaid recharges in one year ) लागतात. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना दिलेल्या आदेशात म्हटले, की प्रत्येक दूरसंचार कंपनी 30 दिवसांची वैधता देणारे ( plan validity of thirty days ) व्हाउचर देईल. एक विशेष टॅरिफ वाउचर आणि एक कॉम्बो वाउचर दिले जाणार आहे. या नियमांचे दूरसंचार कंपन्यांना 60 दिवसांमध्ये पालन करावे लागणार आहे.

हेही वाचा-5G Technology : 5G तंत्रज्ञानामुळे चौथ्या औद्यागिक क्रांतीला सुरुवात होणार; डॉ. कल्याणी यांची प्रतिक्रिया

5G तंत्रज्ञान सज्ज

जगभरातील लोकांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी 5G तंत्रज्ञान सज्ज झाले आहे. असे दूरसंचार तज्ञ कल्याणी बोगीनेनी (Telecommunications expert Kalyani Bogineni) सांगतात. त्या पुढे म्हणतात की,आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डेटा एनालिटिक्स या सारख्या टेक्निकल नवीन कल्पनामुळे संपूर्ण जग मानवाच्या एका बोटावर वसलेले असणार आहे. जे शिक्षण, आरोग्यसेवा आणि कृषी क्षेत्रात खुप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर 5G हायस्पीड इंटरनेट आणि इतर नागरी सुविधा सर्वांसाठी सुलभ होणाार आहेत. तसेच ज्या दुर्गम भागात नेटवर्क कनेक्टीव्हीटीची समस्या आहे, अशा ठिकाणी वायरलेस ब्लॅक-होल तंत्रज्ञानाद्वारे अखंडीत ऑनलाईन शिक्षण देता येईल.

हेही वाचाReliance Jio : रिलायन्स जिओने बीएसएनएलला सर्वात मोठे फिक्स्ड लाइन ब्रॉडबँड प्रदाता म्हणून टाकले मागे

ABOUT THE AUTHOR

...view details