मुंबई -भारत देशासह संपुर्ण जगाला आपल्या सुमधूर आवाजाने प्रत्येत श्रोत्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 92 वा वाढदिवस. आज जगभर त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. लतादीदी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. महाराष्ट्रासह देशभरात कित्येकांची त्यांच्या आवाजातील गाणे ऐकल्याशिवाय सकाळ होत नाही.
लता मंगेशकर यांनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर
संगीतक्षेत्रात एक अढळ असं स्थान लता मंगेशकर यांनी निर्माण केले आहे. या काळात दीदीला आतापर्यंत हजारो पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, (2001)मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार भारत सरकारच्या वतीनं दिला जातो. आतापर्यंत 3 नॅशनल अवार्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पदमविभूषण हे पुरस्कार देऊनही दिदींना गौरवण्यात आलं आहे.1974 ते1991 या काळात सर्वाधिक गाण्यांची रेकॉर्डिंग केल्याने दीदींचे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे.
उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले