महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ट्रकने चिरडल्याने तिघांचा मृत्यू - गाझियाबाद जिल्हा बातमी

गाझियाबादच्या विजयनगर बायपासजवळ ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

अपघात
अपघात

By

Published : Jan 31, 2021, 10:38 PM IST

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) -विजयनगर बायपासजवळ ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक अचानक गर्दीत गेला. यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त ट्रक बाजूला केले आहे. नागरिकांच्या मदतीने ट्रक चालकाला पकडण्यास पोलिसांना यश आला आहे.

घटनास्थळ

ट्रकचे ब्रेक झाले होते निकामी

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, ट्रक राष्ट्रीय महामार्ग 24 वरून येत होता. त्यावेळी अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक पदपथावर गेला.

वाहतूक कोंडी

राष्ट्रीय महामार्ग 24 व दिल्ली-मेरठ दृतगती महामार्गाजवळ अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा -माझे टि्वटर खाते ह‌ॅक करून शेतकऱ्यांना रोखणार का मोदी चाचा?

ABOUT THE AUTHOR

...view details