जयपूर : राजस्थानच्या जालोरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या नऊ दिवसांमध्ये एका मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
जालोर जिल्ह्याच्या रायपुरीयामधील रहिवासी ईश्वर सिंह यांची मुलगी कृष्णा, आणि बैरठ गावचा शैतान सिंह यांचे ३० एप्रिलला धूमधडाक्यात लग्न झाले होते. लग्नाचे सर्व विधी मोठ्या आनंदाने पार पाडून कृष्णा आपल्या सासरी आली होती. मात्र, तिचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. लग्नाच्या नऊ दिवसांनंतरच शैतानसिंहचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न होऊन घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शैतानसिंहची तब्येत बिघडली होती. यानंतर तपासणी केली असता, त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शैतानसिंहची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच गेली. अखेर ९ मे रोजी त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
सोशल मीडियावर घटना व्हायरल..