श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील दहशतवादी सामान्य लोकांना लक्ष्य करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे. सुरक्षा दलांकडून वाढता दबाव आणि जनतेचा पाठिंबा कमी झाल्यामुळे, दहशतवादी आता त्यांची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी निरपराधांचे रक्त सांडत आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचलं गेलं आहे. या अंतर्गत सुमारे 200 लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सरकारशी जवळीक असणारे, माध्यम व्यक्ती, काश्मिरी पंडित आणि सुरक्षा दलांच्या संपर्कात असलेले लोक आहेत. बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे.
आयएसआयचे षडयंत्र, 200 सामान्य लोकांची हत्या करण्याचा कट - जम्मू काश्मीर
सुरक्षा दलांकडून वाढता दबाव आणि जनतेचा पाठिंबा कमी झाल्यामुळे, दहशतवादी आता त्यांची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी निरपराधांचे रक्त सांडत आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचलं गेलं आहे. या अंतर्गत सुमारे 200 लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
![आयएसआयचे षडयंत्र, 200 सामान्य लोकांची हत्या करण्याचा कट terrorist Attack on Minority Civilians in Jammu Kashmir](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13377425-thumbnail-3x2-io.jpg)
आयएसआयच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयएसआयने गेल्या दीड वर्षात अनेक नवीन संघटना निर्माण झाल्या आहेत. संघटना दहशतवाद्यांना सामान्य लोकांना लक्ष्य करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे जेणेकरून दहशत पसरली जाईल. सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी सरकारच्या जवळच्या लोकांना लक्ष्य करण्याचे षडयंत्र रचत आहेत. याशिवाय आरएसएस आणि भाजपाशी संबंधित लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. त्याचबरोबर इतर राज्यांच्या लोकांनाही विनाकारण लक्ष्य केले जात आहे. गेल्या वर्षी ISI ने लष्करसाठी The Resistance Front (TRF) नावाची संघटना स्थापन केली होती. आता याच संघटनेने काश्मीरमधील बहुतेक हल्ल्यांचा दावा केला आहे.