महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sharad Pawar on Haryana Election : राष्ट्रवादी पुढील वर्षी हरियाणात निवडणूक लढविणार - शरद पवार - भारत जोडो यात्रा शरद पवार

हरियाणाच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस सक्रिय होत आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हरियाणाच्या कर्नालला भेट दिली. 19 मार्च रोजी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा होणार आहे. यामध्ये हरियाणातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Jan 31, 2023, 7:02 AM IST

शरद पवार

कर्नाल (हरियाणा) : पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीची सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांनी याबाबत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी सायंकाळी उशिरा हरियाणातील कर्नाल येथे पोहोचले. यावेळी त्यांनी 19 मार्च रोजी कर्नाल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रवादी महासंमेलनाची माहिती दिली. या परिषदेत संपूर्ण हरियाणातून कामगार सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हरियाणात निवडणूक लढवणार : हरियाणाच्या राजकारणात आता राष्ट्रवादी सक्रिय होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे हरियाणा प्रदेशाध्यक्ष मराठा वीरेंद्र वर्मा यांनी शरद पवार यांचे कर्नालला पोहोचल्यावर जोरदार स्वागत केले. 19 मार्च रोजी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा होणार आहे. यामध्ये हरियाणातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याच संदर्भात ते हरियाणात आले आहेत. राष्ट्रवादी हरियाणात निवडणूक लढवणार की नाही, या प्रश्नावर पवार म्हणाले की, हरियाणात राष्ट्रवादी नक्कीच निवडणूक लढवणार आहे. सर्व जागांवर नाही मात्र काही जागांवर नक्कीच हात आजमावू असे ते म्हणाले.

भारत जोडो यात्रेला सर्वत्र पाठिंबा : यावेळी बोलताना पवार म्हणाले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला शेतकरी वर्ग असो की गरीब वर्गातील जनता, सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेला देशातील जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. गेल्या अनेक वर्षात राजकारणात राहुल गांधींबद्दल ज्याप्रकारे बोलले जात होते त्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले. या पदयात्रेतून सर्व काही समोर आले आहे.

भारत जोडो यात्रेचा समारोप : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा सोमवारी काश्मीरमध्ये समारोप झाला. यावेळी काँग्रेसने श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, मला भारत जोडो यात्रेने खूप काही शिकवले आहे. अनेकदा मला वेदना व्हायच्या पण मी त्या सहन केल्या. मी भारत जोडो यात्रा सुरु केली तेव्हा मला सांगण्यात आले की, जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही शेवटचे चार दिवस कारने फिरा. तिकडे पायी फिरू नका, कारण तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. मात्र तसे काही झाले नाही. काश्मिरच्या लोकांनी मोठ्या उत्साहाने माझे स्वागत केले. मला काश्मीरवासीयांचे भरभरून प्रेम मिळाले.

हेही वाचा :Bharat Jodo Yatra Concludes : मी माझ्या लोकांसोबत चाललो! राहुल गांधींना अश्रू अनावर; ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा समारोप

ABOUT THE AUTHOR

...view details