महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 5, 2023, 1:39 PM IST

Updated : Mar 10, 2023, 7:15 AM IST

ETV Bharat / bharat

Savitribai Phule Death Anniversary : यंदा सावित्रीबाई फुले यांची 126 वी पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य

समाजाचा द्वेष पतकरुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई यांची 10 मार्च रोजी पुण्यतिथी आहे. सावित्रीबाईंबद्दल काही गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.

Savitribai Phule Death Anniversary
सावित्रीबाई फुले यांची 126 वी पुण्यतिथी

हैदराबाद : भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून अख्ख्या जगात सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. महिलांना शिक्षण घेणे तर दूरची गोष्ट, घराबाहेर पडणेही शक्य नसताना त्यांनी हे यश संपादन केले. सावित्रीबाई जेव्हा शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगडफेक करायचे, अशी टीकाही त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी केली. पण प्रत्येक अडचणीचा त्यांनी खंबीरपणे सामना केला. त्यांचे पती ज्योतिराव यांनीही त्यांच्या पत्नीला पूर्ण पाठिंबा दिला आणि तिला प्रोत्साहन दिले. सावित्रीबाई फुले यांच्या 126 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या बाबत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

  1. सामाजिक भेदभाव आणि अनेक अडथळ्यांना न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि इतर महिलांनाही शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला.
  2. सावित्रीबाई फुले यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री मुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या म्हटले जाते.
  3. त्यांनी त्यांचे पती क्रांतिकारी नेते ज्योतिराव फुले यांच्यासमवेत मुलींसाठी १८ शाळा उघडल्या होत्या.
  4. पहिली शाळा 1848 मध्ये पुणे बालिका विद्यालय सुरू झाली.
  5. समाजात प्रचलित असलेल्या अनेक सामाजिक वाईट प्रथा व रुढींना सावित्रीबाईंनी सदैव विरोध केला. आणि ज्या चुकीच्या प्रथा विशेषत: स्त्रियांविरोधात होत्या; त्याला त्यांचा प्रखर विरोध होता .
  6. त्यांनी सतीप्रथा, बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह बंदी याविरोधात आवाज उठवला आणि आयुष्यभर त्यासाठी लढा दिला.
  7. त्यांनी एका विधवा ब्राह्मण महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले आणि त्यांचा नवजात मुलगा दत्तक घेतला. यशवंत राव असे त्यांचे नाव होते. ते शिकून डॉक्टर झाले.
  8. १८९७ मध्ये त्यांचा मुलगा यशवंत राव यांच्यासमवेत त्यांनी प्लेगच्या रूग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटल उघडले.
  9. 28 जानेवारी 1853 रोजी त्यांनी गर्भवती बलात्कार पीडितांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
  10. सावित्रीबाईंनी एकोणिसाव्या शतकात अस्पृश्यता, सती प्रथा, बालविवाह आणि विधवा पुनर्विवाह बंदी यांसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध त्यांच्या पतीसोबत एकत्र काम केले.
  11. प्लेगच्या रूग्णांची काळजी घेत असताना, त्या स्वतःच याची शिकार झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
Last Updated : Mar 10, 2023, 7:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details