महाराष्ट्र

maharashtra

Mohan Bhagwat : देशाच्या प्रगतीची चिन्हे आता सर्वत्र दिसू लागली आहेत : मोहन भागवत

By

Published : Jul 14, 2022, 9:49 AM IST

आरएसएस प्रमुख मोहन भागवत ( rss chief mohan bhagwat ) यांनी मोठं विधान केलं आहे की, खायचे आणि लोकसंख्या ( Mohan Bhagwat on Population Growth ) वाढवायची, हे काम तर प्राणीही करतात. जंगलात सर्वात शक्तिशाली असणे महत्वाचे आहे. मानवामध्ये, इतरांचे रक्षण करणे हा सर्वात मोठा गुण असल्याचे भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat
मोहन भागवत

बेंगळुरू: आरएसएस प्रमुख मोहन भागवत ( rss chief mohan bhagwat ) यांनी श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. तेथील भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. धर्मांतराचाही उल्लेख करण्यात आला आणि लोकसंख्येवरही मोठे विधान केले गेले. ते पुढे म्हणाले की, देशाच्या प्रगतीची चिन्हे आता सर्वत्र दिसू लागली आहेत. चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई गावात ‘श्री सत्य साई विद्यापीठ फॉर ह्युमन एक्सलन्स’ च्या पहिल्या दीक्षांत समारंभात भागवत म्हणाले, “भारत पुढे जाईल असे १०-१२ वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते, तर आम्ही ते गांभीर्याने घेतले नसते."

पराक्रमी लोकच टिकतील :मोहन भागवत म्हणाले की, जिवंत राहणे हे जीवनाचे ध्येय असू नये. मानवाची अनेक कर्तव्ये आहेत, जी त्याने वेळोवेळी करत राहिली पाहिजेत. अन्न खाणे आणि लोकसंख्या वाढवने ( Mohan Bhagwat on Population Growth ) हे काम तर प्राणीही करू शकतात. पराक्रमी लोकच टिकतील, हा जंगलाचा नियम आहे. त्याच वेळी, जेव्हा शक्तीशाली इतरांचे रक्षण करू लागतात, तेव्हा ते मानवाचे लक्षण आहे. ते म्हणाले की, राष्ट्रत्वाची प्रक्रिया लगेच सुरू झाली नाही, ती 1857 पासून आहे, जी स्वामी विवेकानंदांनी पुढे नेली. विज्ञानाला अद्याप सृष्टीचा उगम समजला नसल्यामुळे अध्यात्मिक माध्यमातून उत्कृष्टता साधता येते, असे संघप्रमुख म्हणाले.

भाषा वेगळी असेल तर वाद निर्माण होतो :भागवत म्हणाले की, सध्याच्या विज्ञानामध्ये बाह्य जगाच्या अभ्यासात समन्वय आणि संतुलनाचा अभाव आहे, परिणामी सर्वत्र वाद निर्माण होतात. ते म्हणाले, तुमची भाषा वेगळी असेल तर वाद होतो. तुमची उपासना पद्धत वेगळी असेल तर वाद होतात आणि तुमचा देश वेगळा असेल तर वाद होतात. विकास आणि पर्यावरण आणि विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात वाद आहे. अशा प्रकारे गेल्या 1000 वर्षांत जगाने प्रगती केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन, माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर आणि गायक पंडित एम. व्यंकटेश कुमार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :Dharma Sabha in Raipur: मी धर्मासोबत उभा आहे आरएसएस अन् मोहन भागवत यांच्यासोबत नाही -स्वामी निश्चलानंद सरस्वती

ABOUT THE AUTHOR

...view details