महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Riyagatlapalli village : 40 वर्षांपासून पोलीस स्टेशनची पायरी न चढलेले रियागतलापल्ली एक आदर्श गाव - Riyagatlapalli village

रियागतलापल्ली हे 40 वर्षांपासून एकही पोलीस केस नसलेले आदर्श गाव ( Riyagatlapally ideal village with no police case )आहे. रियागतलापल्ली गावातील एकाही ग्रामस्थाने आजपर्यंत पोलीस ठाण्याची एकही पायरी चढलेली ( Riyagatlapally an ideal village ) नाही. हे कामरेड्डी मेडक जिल्ह्यांच्या सीमेवर भिक्कनूर येथे आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा न्यायाधीश श्रीदेवी यांनी रियागतलापल्लीला ''कायदेशीर कारवाईमुक्त गाव'' म्हणून घोषित ( Riyagatlapally village free from legal action ) केले होते. मंगळवारी तिथल्या प्रतिनिधींना त्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Riyagatlapalli village
रियागतलापल्ली एक आदर्श गाव

By

Published : Sep 30, 2022, 5:17 PM IST

कामरेड्डी - रियागतलापल्ली हे 40 वर्षांपासून एकही पोलीस केस नसलेले आदर्श गाव ( Riyagatlapally ideal village with no police case )आहे. रियागतलापल्ली गावातील एकाही ग्रामस्थाने आजपर्यंत पोलीस ठाण्याची एकही पायरी चढलेली ( Riyagatlapally an ideal village ) नाही. हे कामरेड्डी मेडक जिल्ह्यांच्या सीमेवर भिक्कनूर येथे आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा न्यायाधीश श्रीदेवी यांनी रियागतलापल्लीला ''कायदेशीर कारवाईमुक्त गाव'' म्हणून घोषित ( Riyagatlapally village free from legal action ) केले होते. मंगळवारी तिथल्या प्रतिनिधींना त्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रगती हेच गावाचे ध्येय - 930 लोकसंख्या, 180 कुटुंबांसह, ते सर्व कुटुंबासारखे राहतात. याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे सदस्य असले तरी ते निवडणुकीच्या वेळीच राजकारण करत नाहित. गावात विकासाचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करत आहेत. आर्थिक स्वयंपूर्णतेच्या उद्देशाने भाजीपाला लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित करून ते पुढे जातात. इथे दारूवरून मारामारी होऊ नये म्हणून या उद्देशाने गावातील एक अनधिकृत दारूचे दुकान 12 वर्षांपासून बंद आहे. जर कोणी दारू विकल्यास त्याला पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठांच्या उपस्थितीत पंचायत - गावकऱ्यांसाठी पोलीस स्टेशन म्हणजे गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पंचायत आयोजित केली जाते. कोणाचे भांडण झाले तर ते गावकऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करतात. सामंजस्याने प्रश्न वाद सोडवले जातात. 63 सभासद असलेली असोसिएशन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. समस्या असतील तर ही संस्था घरोघरी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवते. भिक्कनूरचे एसआय आनंद गौड सांगतात की त्यांच्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीत येथे एकही गुन्हा दाखल झालेला नाही

सर्वांच्या उपस्थितीत उपाय - गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या उपस्थितीत समस्यांवर चर्चा करून दोन्ही पक्षांना मान्य असलेला तोडगा काढतात. आत्तापर्यंत कोणतेही प्रकरण गुन्हे दाखल करण्यापर्यंत गेले नाही. पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देणारे कोणीही आजपर्यंत पाहिले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details