महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ghulam Nabi Azad : कलम 370 ची पुनर्स्थापना आता शक्य नाही, गुलाम नबी आझाद यांचे मोठे विधान

काँग्रेसचे माजी नेते Former Congress leader जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad यांनी काश्मीरमधील एका रॅलीत कलम ३७० Article 370 restoration पुनर्स्थापनेवर मोठे विधान केले आहे. त्यांनी १० दिवसांत त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे.

By

Published : Sep 12, 2022, 8:30 AM IST

Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi Azad

बारामुल्ला (काश्मीर):काँग्रेसचे माजी नेते Former Congress leader जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad यांनी काश्मीरमधील एका रॅलीत Baramulla rally ghulam nabi azad कलम ३७० Article 370 restoration पुनर्स्थापनेवर मोठे विधान केले आहे. त्यांनी १० दिवसांत त्यांच्या नवीन पक्षाची ghulam nabi azad new party घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. आझाद यांनी रविवारी सांगितले की कलम 370 च्या मुद्द्यावर ते लोकांची दिशाभूल करणार नाहीत. संसदेत केवळ दोन तृतीयांश बहुमत असलेले सरकार ही तरतूद पुनर्स्थापित करू शकते. गेल्या महिन्यात काँग्रेस सोडल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील त्यांच्या पहिल्या रॅलीत आझाद म्हणाले, "मला यांना माहित आहे की, काय केले जाऊ शकते आणि काय केले जाऊ शकत नाही. मी किंवा काँग्रेस पक्ष किंवा तीन प्रादेशिक पक्ष तुम्हाला कलम 370 परत देऊ शकत नाहीत.

10 दिवसांत नविन राजकीय पक्ष - गुलाम नबी आझाद यांनी रविवारी सांगितले की, मी 10 दिवसांत Azad said he will announce a new party in 10 days आपल्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा करणार आहे. या पक्षाची विचारधारा "मुक्त" असेल असे प्रतिपादन त्यांनी केले. नवीन राजकीय पक्षाचा अजेंडा जम्मू आणि काश्मीरचे राज्य पुनर्संचयित करणे, नोकऱ्या, जमिनीच्या हक्कांसाठी माझा पक्ष कायम लढा देईल अशी घोषणा त्यांनी केली. पुढे बोलतांना ते म्हणाले, "माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि माझ्या नवीन पक्षाचा आधार असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो.

रोजगार देण्यावर लक्ष -"माझ्या पक्षाचे नाव मी अजून ठरवलेले नाही. जम्मू-काश्मीरचे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. मी माझ्या पक्षाला एक भारतीय नाव देईन. जे सर्वांना समजेल," असे ते रॅलीत म्हणाले. "माझा पक्ष पूर्ण राज्याचा दर्जा, जमिनीचा अधिकार, मूळ निवासींना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करेल," असे त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसला 350 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही -ते म्हणाले, "प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्याने राज्यसभेतील त्यांची संख्या कमी होत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असे मला वाटत नाही. "आझाद यांनी कलम 370 रद्द करण्याच्या बाजूने मतदान केल्याच्या त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांच्या आरोपाचा संदर्भ देत ते म्हणाले की बुखारी यांनी आधी संसद कशी चालते हे समजून घेतले पाहिजे.

गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय पदाचा राजीनामा -काँग्रेस पक्षावर टीका करताना आझाद म्हणाले, "काँग्रेस आमच्या रक्ताने बनली आहे, संगणकाने नाही, ट्विटरने नाही. लोक आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांची पोहोच फक्त कॉम्प्युटर आणि ट्विटपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळेच काँग्रेस कुठेही उरलेली नाही." आझाद यांनी गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय पदाचा राजीनामा दिला होता. उल्लेखनीय म्हणजे, ते 2005 ते 2008 पर्यंत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते.

राहुल गांधींवर निशाणा -सोनिया गांधींना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी गेल्या नऊ वर्षात पक्ष ज्या पद्धतीने चालवला आहे त्यावरून पक्ष नेतृत्वावर, विशेषतः राहुल गांधींवर निशाणा साधला होता. पाच पानी पत्रात, आझाद यांनी दावा केला होता की, सोनिया गांधी केवळ "नाममात्र प्रमुख" असताना एक समूह पक्ष चालवतो. सर्व प्रमुख निर्णय "राहुल गांधी किंवा त्याहूनही वाईट त्यांचे सुरक्षा रक्षक, पीए" हे पक्षाचे निर्णय घेतात.

ABOUT THE AUTHOR

...view details