महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

RBIs New Rule For Bank : कर्जदारांच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवणाऱ्या बँकांवर होणार दंडात्मक कारवाई

RBI ने घालून घेतलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास बँकांवर दंड आकारला जातो. याचप्रमाणे जर बँकांनी कर्जदारांच्या मालमत्तेची कागदपत्रे गहाळ केली किंवा गमावली तरीही बँकांवर कारवाई केली जाणार आहे.

By

Published : Jun 12, 2023, 8:09 AM IST

RBIs New Rule For Bank
आरबीआयचा नवा नियम

नवी दिल्ली : बँकेतून कर्ज घेत असताना बँक कर्जदाराकडे मालमत्तेविषयीचे काही मुळ कागदपत्र मागत असते. कर्जदार ते कर्जफेड करत नाही तोपर्यंत ते कागदपत्र बँका आपल्या ठेवत असतात. परंतु वेळेवर कर्ज फेड केल्यानंतरही बँका ते कागदपत्र लवकर परत करत नाहीत. त्यामुळे अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. आता आरबीआय यावर नवा नियम आणणार आहे. त्यानुसार बँकांकडून कर्जदारांच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे हरवल्यास कर्जदारांना भरपाई द्यावी लागेल आणि दंडही भरावा लागेल.

का करण्यात येणार नियम : वेळेवर मूळ कागदपत्र मिळत नसल्याच्या तक्रारी कर्जदारांनी आरबीआयकडे केल्या होत्या. त्यानुसार आरबीआयने या प्रकरणी एक समिती स्थापन केली होती. RBI ने गेल्या वर्षी मे महिन्यात बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांमधील ग्राहक सेवा मानकांचे पुनरावलोकन करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीची शिफारस आरबीआयने मान्य केल्यास कर्जदारांना भरपाई द्यावी लागेल. दरम्यान, आरबीआयने माजी डेप्युटी गव्हर्नर बीपी कानूनगो यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल यावर्षी एप्रिलमध्ये मध्यवर्ती बँकेला सादर केला होता.

अशी शिफारसची आवश्यकता का :कर्जाची वेळेवर परतफेड करूनही मालमत्तेची कागदपत्रे बँकांना परत करण्यास बराच वेळ लागत असल्याच्या अनेक तक्रारी आरबीआयकडे आल्या आहेत. याचबरोबर कर्जदाराकडे मूळ मालमत्तेचे दस्तऐवज असणे आवश्यक आहे, कारण ते जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित विवाद सोडविण्यास मदत करते. याशिवाय भविष्यातील व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित इतर बाबींमध्येही ही कागदपत्रे उपयुक्त ठरतात. मालकीचे दस्तऐवज, जसे की टायटल डीड, एखाद्याच्या मालमत्तेच्या मालकीचे कायदेशीर सत्यापन म्हणून कार्य करतात. ही कागदपत्रे त्यांच्या मूळ स्वरूपात ठेवल्याने भविष्यात संभाव्य वाद किंवा फसवणूक होण्याचा धोकाही कमी होतो.

आरबीआयच्या समितीच्या शिफारसी : आरबीआयने माजी डेप्युटी गव्हर्नर बीपी कानूनगो यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल यावर्षी एप्रिलमध्ये मध्यवर्ती बँकेला सादर केला होता. या असे म्हटले होते की, कर्जदाराच्या मालमत्तेची कागदपत्रे गहाळ झाल्यास बँकांना केवळ त्यांच्या खर्चावर कागदपत्रांच्या प्रमाणित नोंदणीकृत प्रती मिळविण्यासाठी मदत करण्यास बांधील असावे. तसेच कागदपत्रांच्या पर्यायी प्रतींची व्यवस्था करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन ग्राहकाला पुरेशी भरपाई देखील दिली पाहिजे.

नागरिकांकडून मागवले मत : दरम्यान या पॅनेलने आरबीआयला असेही सुचवले आहे की, जर कर्ज खाते बंद झाले तर खाते बंद झाल्यानंतर कर्जदाराला त्याचे कागदपत्रे परत देण्यासाठी एक वेळ मर्यादा असावी. कागपत्र परत देण्यास विलंब झाल्यास बँकांनी कर्जदाराला दंडाच्या स्वरूपात भरपाई द्यावी. साधरणपणे बँका मूळ मालमत्तेच्या कागदपत्रे कर्जदारांकडून मागवत असतात. ते कागदपत्र कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत आपल्याकडे ठेवतात. दरम्यान आरबीआयने समितीच्या शिफारशींवर ७ जुलैपर्यंत जनतेचे मत मागवले आहे.

हेही वाचा -

  1. Today Cryptocurrency Price: मार्केटमध्ये आज काय स्वस्त आणि काय महाग? वाचा पेट्रोल डिझेल, क्रिप्टोकरन्सी, भाजीपाला आणि सोने चांदीचे दर
  2. RBI repo rate: कर्जदारांनी सोडला सुटकेचा श्वास; नाही वाढणार तुमच्या कर्जाचा हप्ता, आरबीआयच्या रेपो दर कायम

ABOUT THE AUTHOR

...view details