महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 23, 2021, 5:13 PM IST

Updated : Nov 23, 2021, 6:29 PM IST

ETV Bharat / bharat

रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर? रेल्वे चालविण्याकरिता केंद्राने खासगी कंपन्यांकडून मागविले अर्ज

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, की भारत गौरवसाठी 180 रेल्वे आणि 3033 रेल्वे डब्बे ठेवण्यात आले आहेत. आजपासून त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू (Application to run Railways) होणार आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी वाहतूक सेवा देणाऱ्या रेल्वेबाबत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वे ही खासगी कंपन्यांना चालविण्याला देण्यासाठी आजपासून अर्ज मागविले आहेत. ही माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली.

केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) म्हणाले, की भारत गौरव रेल्वेचा उद्देश हा पर्यटनाला प्रोत्साहन देणे आहे. भारत गौरव रेल्वेसाठी 180 हून अधिक रेल्वे (Allocation of more than 180 trains) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 3033 रेल्वे डबे (3033 Identity of Coaches) राखीव आहेत. आहेत.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Railway Minister Ashwini Vaishnav) म्हणाले, की आपल्याला डिझाईनिंग, जेवण, पोषाख आणि अन्य गोष्टींच्या प्रक्रियेबाबत सजग राहण्याची गरज आहे.

हेही वाचा-Taj Mahal : बुरहानपूरच्या 'शाहजहा'ने पत्नीला भेट दिला 'ताज महल'

सांस्कृतिक वारसा आणि रेल्वे एकत्रित यावे हे पंतप्रधानांचे व्हिजन

भारताचा सांस्कृतिक वारसा आणि रेल्वे एकत्रित यावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. त्यानुसार रेल्वेने हजारांहून अधिक भागीदारांशी चर्चा केली आहे. त्यानंतर भारत गौरव रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे कोणतेही ऑपरेटरकडून चालवू शकतो. राज्य सरकारांनीही ही रेल्वे चालविण्याकरिता रस दाखविला आहे.

हेही वाचा-रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर? रेल्वे चालविण्याकरिता केंद्राने खासगी कंपन्यांकडून मागविले अर्ज

रेल्वेचे भाडे टूर ऑपरेटर निश्चित करणार

रेल्वेचे भाडे टूर ऑपरेटर निश्चित करणार आहे. सर्व ऑपरेटरची आयसीएफ कोचची मागणी आहे. त्यानुसार ऑपरेटरला हवे ते डबे देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भागीदार हे बदल करून रेल्वे सुरू ठेवणार आहेत. त्यामुळे देखभाल, दुरुस्ती आणि इतर सुविधेसाठी मदत होणार आहे.

हेही वाचा-CBI Joint Director : महाराष्ट्रकन्या विद्या कुलकर्णींची सीबीआयच्या सहसंचालकपदी निवड

Last Updated : Nov 23, 2021, 6:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details