बंगळुरू :काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हर्थीकोट गावातून 'भारत जोडो यात्रा' सुरू( Bharat Jodo Yatra ) केली. 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या या प्रवासाने आतापर्यंत 867 किलोमीटरचे अंतर कापले आहे. ते एकूण 12 राज्यांमधून जातील आणि जम्मू-काश्मीरमध्ये यात्रा संपेल. आज यात्रेचा ३४ वा दिवस आहे.
Bharat Jodo Yatra : ३४ वा दिवस; चित्रदुर्ग येथे भारत जोडो यात्रेला राहुल गांधीनी केली पुन्हा सुरूवात
काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हर्थीकोट गावातून 'भारत जोडो यात्रा' ( Bharat Jodo Yatra ) सुरू केली आहे.
राहुल गांधी भारत जोडो यात्रा
यात्रेबाबत सातत्याने हल्लाबोल : राहुल गांधी यांनी सोमवारी तुमकूर जिल्ह्यातील पोचकट्टे येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू केली. हा प्रवास सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीही भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी, विरोधी पक्ष राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत सातत्याने हल्लाबोल करत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही हल्लाबोल केला आहे.