नवी दिल्ली ःनीती आयोगाची बैठक ( Niti Commission meeting in Delhi ) रविवारी नवी दिल्ली येथे पार पडली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shindes meeting with Niti Commission ) यांनी उपस्थिती दर्शविली. बैठकीत बोलताना शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेबाबत ( Jalyukta Shiwar Plan in Maharashtra ) बैठकीत चर्चा केली. यासह कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल ( radical changes in agricultural sector ) करण्याविषयी आपण मंथन करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषदेत ( CM Shindes Press Conference in Delhi ) म्हणाले.
CM Eknath Shinde : कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करणार; मुख्यमंत्री शिंदेंची नीती आयोगाच्या बैठकीत घोषणा - CM Shindes Press Conference in Delhi
नीती आयोगाची बैठक ( Niti Commission meeting in Delhi ) रविवारी नवी दिल्ली येथे पार पडली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shindes meeting with Niti Commission ) यांनी उपस्थिती दर्शविली. बैठकीत बोलताना शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेबाबत ( Jalyukta Shiwar Plan in Maharashtra ) बैठकीत चर्चा केली. यासह कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल ( radical changes in agricultural sector ) करण्याविषयी आपण मंथन करीत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषदेत ( CM Shindes Press Conference in Delhi ) म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण योजना आणणार - नीती आयोगाच्या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षणाच्या डिजिटलायजेशनवर भर देण्यासह राज्यात आपले गुरुजी उपक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले. राज्यात राष्ट्रीय शिक्षण योजना आणण्याचा विचार असून राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांचे फोटो लावले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने नवीन शहर उभारण्यावर बैठकीत चर्चा पार पडली. यासह राज्यात एक खिडकी सेवा योजनेवर भर दिला जाईल. राज्याच्या आर्थिक विकासाकरिता केंद्राकडून जीएसटीचा परतावा आणी निधीही मिळेल अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. राज्यात इंधन तेलाचे उत्पादन वाढविण्याचे उद्देश्य असून तेलाची आयात कमी करण्याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.
हेही वाचा - Sunil Raut :'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही'