कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने आपली सारी शक्ती पणाला लावली आहे. ममता यांच्या पक्षातील अनेक बडे नेते भाजपाच्या गळाला लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात नंदीग्राम मतदारसंघात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये ही लढाई प्रतिष्ठेची बनली असून संपूर्ण देशाचे नंदीग्राम मतदासंघाकडे लक्ष लागले आहे. यामुळे नंदीग्राम मतदानाच्या दिवशी हिंसक घटना घडू नये, म्हणून केंद्रीय सुरक्षा दलाच्या 22 कंपन्या मतदारसंघात तैनात करण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामध्ये 1 एप्रिलला म्हणेजच उद्या मतदान होणार आहे. मतदारसंघात एकूण 355 मतदान केंद्र आहे. सध्या मतदारसंघातील वातावरण चांगलेच गरम आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून केंद्रीय सुरक्षा दलाच्या 22 कंपन्या नंदीग्राममध्ये तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. उद्याचा दिवस हाय होल्टेज घडोमोडींचा ठरणार आहे. नंदिग्राममधील लढत सर्वांत लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू अशी सुवेंदू अधिकारी यांची ओळख होती. मात्र, त्यांनी ममता दीदींना रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे सुवेंदू यांच्या विरोधात थेट ममता मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांचे राजकीय भविष्य धोक्यात आहे. मात्र, सुवेंदू यांनी दीदींना पराभूत करू असा विश्वास व्यक्त केलाय.
ममतांचे कडवे आव्हान -