अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव मांडला यावेळी त्यांनी काॅंग्रेसने पुढचे 100 वर्षे सत्तेत यायचेच नाही हे ठरवलेय असे सांगत बोचरी टिका केली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरालाल नेहरू यांच्या पुस्तकातील दाखले देत काॅंग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचत टिका केली.
धन्यवाद प्रस्तावाच्या सुरवातीलाच त्यांनी त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहताना लतादीदींच्या आवाजाने देशाला प्रेरणा दिली असे सांगितले. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याच सोबत देश अमृत काळात प्रवेश करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलीदान दिले त्यांना नमन आहे. असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, भारत कोरोनाच्या संकटावर मात करत आहे. कोरोना ही जागतीक महामारी होती. मात्र, त्याचाही राजकारणासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न झाला. हे मानवतेसाठी योग्य आहे, का, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रसच्या बाकावरुन विरोधीस्वर उमटल्यानंतर मोदी म्हणाले, मी तर कोणाचे नाव घेतले नाही मग, कोणतीही टोपी तुम्ही तुमच्या डोक्यावर का घेता. यानंतर मोदींनी काँग्रेसचे नाव घेऊन आरोप करण्याचा प्रयत्न केल्यानतंर विरोधी बाकावरुन घोषणा सुरु झाल्या.
कोरोना वैश्विक महामारी आहे, आज भारत जवळपास 100 टक्के नागरीकांना पहिला डोस तर 80 टक्के नागरीकांना दुसरा डोस देण्याचे काम पुर्ण करत आहोत पण त्यातही राजकारण केले गेले. कोरोना काळात काॅगेस ने तर हद्द केली, मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांना आपआपल्या राज्यात पाठवले त्यांना तिकीट काढून दिले आणि देशभर कोरोना पसरवला. सगळीकडे आफरातफरी पसरवली. दिल्ली सरकारने तर गल्ली बोळात भोंगे फिरवुन लोकांना वापस पाठवले त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आणि कोरोना पसरवला. कोरोना मोदीच्या प्रतिमेला धक्का बसवेल यासाठी वाट पाहत होते. पण त्याचा फायदा झाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
काॅंग्रेस ने फक्त विरोधाचे राजकारण केले. त्यांनी प्रत्येक गोष्टीला विरोध केला त्यानी फिट इंडिया मुव्हमेंटला विरोध केला , आपल्या देशाने योग जगात पोचवला पण त्यांनी त्यालाही विरोध केला. त्याचा पण उपहास केला तुम्हाला नेमके काय झालेय मला कळत नाही. त्यांचा कार्यक्रम त्यांचा विचार आणि त्यांची कृती पाहिली की असे वाटते की त्यांनी पुन्हा 100 वर्षे सत्तेत यायचेच नाही हे ठरवलेय. आता तुम्ही तयारीच केली आहे तर मी पण तयार आहे.
कोरोना काळातही आपण काम करत राहिलो त्यावर कोणताही परिणाम होउ दिला नाही. कोरोना काळानंतर जगभरातील सर्वच प्रकारचे व्यवहार विस्कळीत झाले आहेत. आणि भारत अनेक बाबतीत आयातीवर अवलंबुन आहे, पण देशाने सगळे ओझे खांद्यावर घेत शेतकरी आणि कोणावरही त्याचा परिणाम होउ दिला नाही. आज आपण अक्षय उर्जेच्या क्षेत्रात जगात पहिल्या 5 मधे आहोत. मी 'व्होकल फॉर लोकल' बद्दल बोललो तर तुम्ही दुर्लक्ष करता. तुम्हाला भारत 'आत्मनिर्भर' घडवायचा नाही का? तुम्हाला (काँग्रेस) महात्मा गांधींची स्वप्ने पूर्ण करायची नाहीत असा सवालही मोंदींनी केला.
आपण आपल्या लहान शेतकऱ्यांना बळकट करणे आवश्यक आहे. आमचे लक्ष त्यांच्याकडे आहे. पण ज्यांना छोट्या शेतकर्यांचे दुःख कळत नाही त्यांना शेतकर्यांच्या नावावर राजकारण करण्याचा अधिकार नाही असे सांगताना त्यांनी काही लोकांना देशातील तरुणांची दिशाभुल करण्यात रस आहे. जे लोक इतिहासातुन शिकत नाहीत ते इतिहासातच रमतात. 1960 ते 1980 या दशकात काय होत होते. त्यात त्यांचे सगळे नेते येतात. काॅग्रेसच्या सोबतचे लोक त्यांना टाटा बिर्लाचे सरकार म्हणुन हिनवत होते. आज तुम्ही चेष्टेचा विषय झाला आहात. मेक इन इंडीयाचा अर्थ आहे कमीशन बंद, देशाच्या युवकांचा, लघुउद्योगांचा अपमाण स्वतः ला येत असलेल्या अपयशा बद्दल आता देशाला अपयशी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केला.
महागाई त्यांच्या आवाक्यात राहिली नाही हे काॅग्रेसचे नेते त्यावेळचे नेते 2012 मधे सांगत होते लोकांना 15 रुपयांची पाण्याची बाटली 20 रुपयांचे आईसक्रिम घ्यायला परवडते पण गहू तांदळात 1 रुपया वाढला तर ओरडतात हा त्यांचा महागाईकडे पाहण्याचा दृष्टीकोन होता. महागाई आणि आवश्यक बाबीची किंमत वाढु नये यासाठी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही काय केले ते आकडे सांगतात. 2014 ते 2020 पर्यंत महागाई 5 टक्यापेक्षा कमी राहिली. कोरोनाच्या काळा नंतरही या वर्षी महागाई 5.2 टक्के राहिली तुम्ही तुमच्या काळात जवाबदारी झटकत होता. तुमच्या काळात ती 2 आकडी होती असा आरोप करताना त्यांनी त्यावेळचे केंद्रिय अर्थ मंत्री चिदंबरम आता अर्थव्यवस्थेवर लेख लिहीत आहेत अशी टिका केली.
काॅग्रेस आज सत्तेत असती तर महागाईचे खापर कोरोनावर फोडुन मोकळे झाले असते. आम्ही हा विषय गांर्भियाने घेतला आम्ही पळकुटे लोक नाहीत. या सदनात गरीबी कमी करण्याचे मोठ मोठे आकडे दिले गेले पण काय झाले, देशाच्या गरीबाचा स्वभाव बिलकुल असा नाही की जे सरकार त्यांचे भले करत आहे. त्याला सत्तेतुन बाहेर ठेवेल. काॅग्रेस 40 वर्षे गरीबी हटावचा नारा देत सत्ता उपभोगलीइंग्रज गेले पण तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची निती काॅग्रेसने अंगीकारली आहे. काॅग्रेसची सत्तेत येण्याची इच्छा संपली आहे. काही मीळणार नाही तर जे आहे ते बिघडवा अशी त्यांची भुमिका आहे. या सदनात इतरांना भडकवण्याचा किती प्रयत्न झाला. असे अनेक लोक आणि गेले पण देश अजरामर आहे. देशाला काहि होणार नाही, हा देश एक होता, श्रेष्ठ होता आणि एकच आणि श्रेष्ठही राहणार असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.