महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

25 JUNE 1983 : आजच्या दिवशीच लॉर्ड्सवर फडकवला होता प्रथमच तिरंगा, भारताने जिंकला होता जागतिक किताब - कपिल देव विश्वचषक

विश्वचषक जिंकणारा भारत हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी दोन्ही विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकले होते. हा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतातील क्रिकेटची परिस्थिती बदलली. देशात क्रिकेटची लोकप्रियता वाढली आणि आता बीसीसीआय हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट बोर्ड आहे.

25 JUNE 1983
25 JUNE 1983

By

Published : Jun 25, 2022, 10:23 PM IST

नवी दिल्ली :25 जूनचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी 39 वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. तसेच पहिल्यांदाच विश्वचषक आपले नाव ( India first World Cup win ) कोरले. यापूर्वीचे दोन्ही विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकले होते. हा अंतिम सामना 25 जून 1983 रोजी भारत आणि त्यावेळचा सर्वात धोकादायक संघ वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला होता. भारताने त्या सामन्यात इतिहास रचला आणि प्रत्येक आव्हानावर मात करत लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून जगाला थक्क केले. त्या दिवसापासून भारतीय क्रिकेटचे रुपडेच बदलले.

हा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतातील क्रिकेटची परिस्थिती बदलली. देशात क्रिकेटची लोकप्रियता वाढली आणि आता बीसीसीआय हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट बोर्ड आहे.

1975 साली क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली. यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा दबदबा होता. या दौऱ्यात कॅरेबियन संघात व्हिव्हियन रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉईडसारखे खेळाडू होते. संपूर्ण दोन दशकांपासून वेस्ट इंडिजकडे अनेक धोकादायक वेगवान गोलंदाज होते, ज्यांना जगभरातील फलंदाज घाबरायचे.

भारताने ही स्पर्धा आश्चर्याने जिंकली आणि कपिल देव विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला.

वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 विश्वचषक जिंकले आणि 1983 मध्ये सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भारतीय संघाने धुळीस मिळवले. या संघाशी ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड स्पर्धा करतील, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. भारताने ही स्पर्धा आश्चर्याने जिंकली आणि कपिल देव विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण कर्णधार ठरले.

1975 आणि 1979 मध्ये निराशाजनक कामगिरीनंतर भारताने अंतिम फेरीत प्रवेश करून त्यांच्या प्रभावी कामगिरीने क्रिकेट जगताला थक्क केले. भारत चार विजय आणि दोन पराभवांसह त्यांच्या गटात दुसऱ्या स्थानावर राहिला होता. भारताने झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. उपांत्य फेरीतही त्याने इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला होता.

हेही वाचा -युक्रेनियन निर्वासितांना विंबल्डन सामन्याची देणार मोफत तिकिटे

ABOUT THE AUTHOR

...view details