महाराष्ट्र

maharashtra

Saudi Arabia government negligence : सौदी सरकारने पाठविलेला मृतदेह पाहून नातेवाईकांना बसला धक्का, निष्काळजीपणाची झाली हद्द!

By

Published : Oct 2, 2022, 11:35 AM IST

चांदौली येथील एका व्यक्तीचा सौदी अरेबियात मृत्यू झाला. माहिती मिळताच नातेवाइकांनी भारतीय दूतावास आणि परराष्ट्रमंत्र्यांकडे तेथून मृतदेह चांदौली येथे आणण्यासाठी मदत मागितली. यानंतर मृतदेह वाराणसी विमानतळावर पोहोचला तेव्हा शवपेटी पाहून सर्वजण थक्क झाले. कारण शवपेटीमध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याचा ( Saudi Arabia hands over wrong dead body ) होता.

Saudi Arabia government
दुसऱ्याचा मृतदेह कुटूंबीयांना सुपूर्द

चांदौली :सौदी अरेबिया सरकारचा मोठा निष्काळजीपणा समोर आला ( Saudi Arabia Government Negligence ) आहे. सौदीत काम करणाऱ्या चंदौली येथील जावेदच्या मृत्यू झाला मात्र त्याचा मृतदेह भारतात पाठवण्याऐवजी, त्याच्या जागी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह वाराणसी विमानतळावर ( Varanasi Airport ) आला. शवपेटीवर साजी राजन असे लिहिले होते. यावर कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करत ट्विट करून भारतीय दूतावास आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांच्याकडे तक्रार केली.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू : वास्तविक, चकिया येथील सिकंदरपूर येथे राहणारा जावेद हा सौदी अरेबियातील दममान येथील एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करत होता. आजारपणामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ( Death during hospital treatment ) झाला. यानंतर मयताचा भाऊ जावेद याने मृतदेह परत करण्यासाठी शासन व इतरांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. डीडीयू नगरचे सीओ अनिरुद्ध सिंग यांनी सोशल मीडिया आणि ट्विटरच्या माध्यमातून मृतदेह परत आणण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे प्रयत्नांना यशही आले. याची दखल घेत सौदी अरेबियातील भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रयत्नांनंतर जावेदचा मृतदेह 30 सप्टेंबर रोजी वाराणसीच्या विमानतळावर आणण्यात आला. परंतु, तपासात हा मृतदेह जावेदचा नसून साजी राजन या अन्य व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न ( Saudi Arabia hands over wrong dead body ) झाले.

सौदी अरेबियात मृत्यू

सौदी सरकारचा निष्काळजीपणा :मृत जावेदचा भाऊ नदीम जलाल इदारसी यांनी थेट सौदी सरकारचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले असून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भारतीय दूतावासालाही ट्विटरच्या माध्यमातून ते कळवले. 25 सप्टेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये भाऊ जावेदच्या मृत्यूनंतर सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर भावाचा मृतदेह दिल्ली विमानतळावरून शुक्रवारी रात्री वाराणसी विमानतळावर पोहोचला. पण, तो मृतदेह त्याच्या भावाचा नव्हता. याशिवाय अनिरुद सिंह यांनीही सौदी दूतावासाला ट्विट करून दखल घेण्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, सौदी अरेबिया सरकारने निष्काळजीपणा दाखवला आहे. चुकीची दखल घेत जावेदचा मृतदेह लवकरच परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details