बेळगाव (बंगळुरू) - सांगोली रायण्णाच्या पुतळाच्यी विटंबणा करणारे समाजकंटक आणि ज्या लोकांनी कन्नड झंड्याला जाळले त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, असा संताप कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के.एस ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -Wild Elephant In Assam : 'गजराज' पिसाळला! एका गावकऱ्याला संतप्त हत्तीने चिरडलं, पाहा VIDEO
बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात ईश्वरप्पा यांनी सदर टीका केली. यावेळी त्यांनी एमईएस ( महाराष्ट्र एकीकरण समिती ) संघटनेवर हल्ला चढवला. जिल्ह्यात एमईएसची घृणास्पद कृत्ये वाढत चालली आहे. एमईएस ही महाराष्ट्र एकीकरण समिती नसून ती महाराष्ट्र भित्रट समिती आहे. सांगोली रायण्णाच्या पुतळाच्यी विटंबणा आणि कन्नड झंड्याची जाळपोळ या दोन्ही घटनांचा मी विरोध करतो. हे निंदनीय कृत्य आहे. जे कोणी या कृत्यात सहभागी होते त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे, असे मंत्री ईश्वरप्पा म्हणाले.