लखनौ - कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना उत्तर प्रदेशमध्येही इतर राज्यांप्रमाणे ऑक्सिजनच्या तुटवड्याचे संकट उद्भवले आहे. मीरत येथील न्यूटिमा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने आठ जण दगावल्याचा दावा करण्यात येत आहे.
मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यूटिमा रुग्णालयात राडा केला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी दावा केला. मीरतचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश मोहन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजन अभावी दगाविल्याचा दावा फेटाळला आहे. रुग्ण हे गंभीर रोगांमुळे मृत्युमुखी पडल्याचे डॉ. मोहन यांनी सांगितले. तसेच मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेले दावेही त्यांनी फेटाळले आहेत.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अखिलेश मोहन म्हणाले, की मी तेथील डॉक्टरांशी बोललो आहे. नातेवाईकांनी ऑक्सिजनचा पुरवठा काही काळ खंडित झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याबाबत तपास केला जात आहे. ऑक्सिजनचा पुरवठा काठोकाठ आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा-पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ