हैदराबाद - गडचिरोली चकमकीनंतर माओवाद्यांनी पत्रक जारी केले असून या चकमकीची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. भद्राद्री जिल्ह्यातील भद्राद्री कोठागुडेम आणि पूर्व गोदावरी जिल्हा माओवादी विभाग समितीच्या नावे पत्रक जारी केले आहे. माओवाद्यांनी गडचिरोली चकमकीच्यान्यायालयीन चौकशीची मागणी केली. ही चकमक पूर्णपणे बनावट असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. सरकारने त्यांना चकमकीच्या नावाखाली मारलं आहे. या चकमकींची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा इशारा मोओवाद्यांनी दिला आहे.
धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxals killed in encounter in Gadchiroli forest) झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी (26 Naxals killed) ठार झाले. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. या चकमकीत नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे(Milind Teltumbde) ठार झाला आहे.