डेहराडून - डोंगराळ भागातील शेतकऱ्यांचा आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने कल वाढू लागला आहे. ते मातीविना शेती करून फळे आणि हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणात पिकवत आहेत. या तंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कोणत्याही हंगामात फळे आणि भाज्यांची लागवड करू शकता. आता डोंगरावरील शेती करणाऱ्यांनीही या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. अल्मोराचे प्रगतीशील शेतकरी दिग्विजय ( Hydroponic Farming In Almora ) सिंह हे गेल्या एक वर्षापासून मातीविना म्हणजेच हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या( Almora Hydroponic Technology ) लागवडीतून शेतीचे उत्पादन घेत आहेत. या तंत्राची मदत घेणारे ते अल्मोडा येथील पहिले शेतकरी आहेत. दिग्विजय सिंग हे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने लेट्यूस आणि इतर हंगामी भाज्यांचे उत्पादन करत आहेत. भाज्यांना दिल्लीसह इतर महानगरांमध्ये मोठी मागणी आहे.
५०० स्क्वेअर मीटर परिसरात पॉलीहाऊस- दिग्विजय सिंह बोरा हे ( Almora Farmer Digvijay Singh ) अल्मोडा येथील इंक देवी परिसरात गेल्या २० वर्षांपासून शेती करत आहे. अनेक दिवसांपासून नवनवीन प्रयोग करून हंगामी भाजीपाला आणि फळे उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या एक वर्षापासून त्यांनी आता हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यास सुरुवात केली आहे. डोंगराळ भागात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याचे दिग्विजय सिंह हे पहिले शेतकरी आहेत. दिग्विजय सिंह बोरा यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी त्यांनी बाहेरील कंपनीच्या मदतीने ५०० स्क्वेअर मीटर परिसरात पॉलीहाऊस उभारले. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने युनिट तयार केले. यामध्ये ते लेट्युस आणि हंगामी भाज्यांच्या अर्धा डझनहून अधिक वाणांचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग दिल्लीमधील कंपनी करत आहे.
इतर शहरांमधून वाढली मागणी- दर आठवड्याला वातानुकूलित व्हॅनद्वारे दिल्ली, लखनऊसह अनेक महानगरांमध्ये लेट्युस आणि भाज्या पाठविण्यात येतात. पंचतारांकित हॉटेलांपासून ते सप्ततारांकित हॉटेलपर्यंत त्याची मागणी असल्याचे ते सांगतात. त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांच्या लेट्युस आणि भाज्यांची विक्री केली आहे. ओकलिफ, लेट्यूस, लोकॅरनो, लेट्यूस, फ्रिशियन या भाज्यांचे ते उत्पादन घेतात.
कमी पाणी वापरून अधिक उत्पादन : दिग्विजय बोरा सांगतात, की हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये कमी पाणी लागते. कमी पाण्यात अधिक उत्पादन होते. वाढत्या जलसंकटात हे तंत्र जलसंधारणासाठीही उपयुक्त ठरणार आहे. दुसरे म्हणजे, या पद्धतीने उगवलेल्या भाजीपाला व पिकामध्ये कोणताही रोग होत नाही. शिवाय, या पद्धतीमुळे उत्पादन घेण्यास कमी वेळ लागतो.
कमी वेळेत उत्पादन-हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामुळे चांगल्या दर्जाच्या आणि कमी वेळेत भाज्यांचे उत्पादन घेता येते. या तंत्रातही कमी मेहनत घ्यावी लागते. जमिनीचे प्रमाण कमी असतानाही घरी बसून ताजी भाजीपाला पिकविणे शक्य आहे. हायड्रोपोनिक तंत्रातील भाजीपाला शेतापेक्षा लवकर तयार होतो.