महाराष्ट्र

maharashtra

उत्तर प्रदेश सरकारला चार वर्ष पूर्ण

By

Published : Mar 19, 2021, 7:37 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व 19मार्च 2017 रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.

उत्तर प्रदेश सरकारला चार वर्ष पूर्ण
उत्तर प्रदेश सरकारला चार वर्ष पूर्ण

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत भाजपाला अभुतपूर्व यश मिळाले होते. सपा-काँग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारूण अपयशाचा सामना करावा लागला होता.

भाजपाच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व 19 मार्च 2017 रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली. या चार वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्ते मोहीम राबवणार आहेत.

हेही वाचा -रिप्ड जीन्स प्रकरण : 'OMG यांचे तर गुडघे दिसतायंत, संघाच्या नेत्यांचा हाफ पॅण्टमधील फोटो शेअर प्रियांका गांधींची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details